शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

१७ हजार गावांमधील जलस्रोतांचा विकास करणार

By admin | Updated: April 10, 2017 04:44 IST

राज्यातील १७ हजार गावांतील तलाव, विहिरी, नद्या आणि इतर जलस्रोतांचा विकास करण्याच्या अभियानाची सुरुवात

मुंबई : राज्यातील १७ हजार गावांतील तलाव, विहिरी, नद्या आणि इतर जलस्रोतांचा विकास करण्याच्या अभियानाची सुरुवात, रविवारी जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशनतर्फे (जिओने) करण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त आॅगस्ट क्रांती मैदानात रविवारी सायंकाळी आयोजित विशेष कार्यक्रमात जिओने ही घोषणा केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान महावीर यांची महाआरती पार पडली. जिओच्या संचालकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.विविध सामाजिक उपक्रमांतून महिलांमध्ये जनजागृती करणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या ट्रस्टला जिओतर्फे ३९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ८०० मुलांचा शैक्षणिक खर्चही जैन बांधवांनी उचलला. अवयव, श्रम आणि धन यांच्या दानामध्ये जैन समाजाचा मोलाचा वाटा आहे. या समाजाच्या मोलाच्या वाट्यामुळेच देश प्रगतिपथावर आहे. लवकरच देश प्रगतिशील वर्गामधून प्रगत देशांच्या यादीत गेलेला दिसेल, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जैन समाजाने ताकदीनीशी केलेल्या मतदानामुळे ऐतिहासिक विजय मिळाला. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आशीर्वाद मागितला होता. तो मतदानातून दिला. देशासह जगाला महावीरांच्या विचारांची गरज आहे.निसर्गाचा प्रकोप ही मोठी समस्या समोर उभी आहे. सर्वांना जगण्याचा अधिकार असून, संतुलन निर्माण करण्यासाठी महावीरांच्या विचारांचे पालन करायला हवे. गोरक्षण हा त्याचाच भाग आहे. म्हणूनच पशुधनातून नैसर्गिक खतांच्या माध्यमातून जमिनीची पत वाचवायला हवी. भगवान महावीरांच्या विचाराने काम करत राहाणार,’ असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.जैन संत नयपदम सागर महाराज यांनी उपस्थित जैन बांधवांना मार्गदर्शन केले. या वेळी जैन समाजासाठी स्वस्तात औषधे आणि एका मेडिक्लेम योजनेची घोषणा करण्यात आली, तसेच साध्वी श्री मयणाश्री यांनी २५ वर्षांपेक्षा लहान वय असलेल्या मुला-मुलींच्या लग्नाचा कायदेशीर हक्क आई-वडिलांकडे असावा, अशी मागणी सरकारकडे केली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सनदी अधिकारी उपस्थित होते. महावीर जन्मोत्सवानिमित्त मुंबईत विविध ठिकाणी सात लाख लाडवांचे वाटप जिओने केले. या वेळी केंद्रीय विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. (प्रतिनिधी)महावीर जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन व्हावा - राज्यपालभगवान महावीरांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी रविवारी केले. भारत जैन महामंडळ यांच्या वतीने पाटकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आचार्य पदमानंदजी महाराज, मुनी महेंद्र कुमार, आमदार राज पुरोहित, राजेंद्र पटणी, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंदडा, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष के.सी. जैन, तरुण जैन, पृथ्वीराज कोठारी, के.सी. सेठी, प्रमोद कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.आज जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण होत असताना भगवान महावीरांचा सर्व मतांचा आदर करण्याची शिकवण देणारा अनेकांतवाद व अहिंसा जगाला विनाशापासून वाचवून शांती, समृद्धी व विकासाच्या वाटेवर नेऊ शकते, असा विश्वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.