शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:09 IST

झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची प्रभावीपणे  अंमलबजावणी होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला या मुद्द्यात लक्ष घालण्याची विनंती केली. या याचिकेवर गुरुवारी न्यायालयात सुनावणी सुरू होती.

मुंबई : भविष्यात हे शहर कसे असेल, ही दृष्टी ठेवून मुंबईचा विकास करण्यात यावा. मोकळ्या जागांचे संवर्धन करावे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने गुरुवारी केली.

पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, याचा विचार करायला हवा. आपल्याला अधिक हरित पट्टे आवश्यक आहेत. खेळण्यासाठी मैदाने हवी आहेत. मुंबईत अनेक हुशार लोक आहेत, ते कुठे जातील? जर मुंबईत ऑलिम्पिकचे आयोजन करायचे असेल तर कुठे जाणार? असा सवाल उच्च न्यायालयाने केला.

झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची प्रभावीपणे  अंमलबजावणी होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला या मुद्द्यात लक्ष घालण्याची विनंती केली. या याचिकेवर गुरुवारी न्यायालयात सुनावणी सुरू होती.

महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला संगितले की, एसआरए सर्व झोपडपट्टीधारकांची  माहिती घेत असून त्यांच्या समस्यांमविषयी आणि त्यावर राज्य सरकारकडे असलेल्या तोडग्याबाबत तक्ता तयार करत आहे. ते काम करण्यासाठी काही दिवसांनी मुदत द्यावी, अशी विनंती सराफ यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी ठेवली.