शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 08:35 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Narhari Zirwal on Raj Thackeray :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारली होती. नरहरी झिरवळ यांनी आदिवासी आमदारांसोबत आंदोलन केले. किरण लहामटे, काशीराम पावरा हे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र या आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरहरी झिरवाळ यांना दोनदा लक्ष्य केलं होतं. झिरवाळ यांच्या आंदोलनानंतर तुम्ही निषेध कसले नोंदवताय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणातल्या लोकांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजे असा अप्रत्यक्ष टोला झिरवाळ यांना लगावला. या सगळ्यावर आता नरहरी झिरवाळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याच्या मागणीला आदिवासी नेते आणि उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी कडाडून विरोध केला होता. आदिवासींची पेगाअंतर्गत रखडलेली भरती आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी काही आमदारांनी आमदारांनी मंत्रालयात आंदोलन केले होते. आमदार नरहरी झिरवाळ, राजेश पाटील, भाजपचे काशीराम पावरा, भाजपचे खासदार हेमंत सावरांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवरच उड्या मारल्या. या सगळ्या प्रकारावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते.  

"सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध? सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?," अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली होती.

त्यानंतर सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरहरी झिरवाळ यांना नाव न घेता टोला लगावला. आज महाराष्ट्राचा राजकारणाचा खेळ झाला आहे, महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदुषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारतंय. खरंतर महाराष्ट्रातील राजकारणात असे लोक आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. आता नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आदिवासी कुठंही उडी मारु शकतो - नरहरी झिरवाळ

"राजकारणाची सर्कस झाली असेल तर मी सर्कस किंवा तमाशा करो, पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या काही १७ संवर्गांना आजपासूनच आदेश दिला आहे. कुणाला नाटक दिसो, सर्कस दिसो काहीही दिसो. ज्या रखडलेल्या गोष्टीही पुढे जात आहेत इतक्या दिवसांत का आल्या नव्हत्या? मी आंदोलन राजकारणासाठी केलं असेन किंवा कुठला हेतू ठेवून केलं असेल. पण मुलांचं हित तर होतं आहे. मी जाळी नसलेल्या ठिकाणीही उडी मारु शकतो, मी आदिवासी आहे. आदिवासी कुठंही उडी मारु शकतो. जाळी होती हे खरं आहे. ज्यांना कुणाला प्रयोग करायचा असेल तर डबल जाळी लावून फक्त उडी मारुन दाखवा तेवढ्या उंचीवरुन. राज ठाकरेंना आव्हान देतो असं नाही, जे कुणीही बोलतात त्यांना मी आव्हान देत आहे. समाजाचं भलं होणार असेल तर मीच नाही अनेक लोक उड्या मारतील.” असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळRaj Thackerayराज ठाकरेDhangar Reservationधनगर आरक्षणMantralayaमंत्रालय