शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
4
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
5
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
6
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
7
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
8
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
9
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
10
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
11
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
12
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
13
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
14
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
15
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
16
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
17
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
18
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
19
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
20
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:50 IST

NCP Deputy CM Ajit Pawar News: आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही. विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

NCP Deputy CM Ajit Pawar News: पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना, मी बारामतीतून सलग निवडणूका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही. लोकांची कामे केली तर लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीकडून नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांकडे काहीही मुद्दे राहिले नसल्याने ईव्हीएमनंतर आता मतदारयाद्यांचा विषय उकरून काढण्यात आला आहे. विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा आयोगाचा काहीही दोष नसतो, पण पराभव झाल्यानंतर तो पचविता येत नसल्याने असे आरोप होत आहेत, या शब्दांत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी

देशात काही मोजक्या संस्था आहेत ज्यांना संविधानाने स्वायत्तता देण्यात आली आहे. निवडणूक आयोग त्यापैकीच एक आहे. आयोगावर होत असलेल्या आरोपांत तथ्य आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात आमच्या उमेदवाराला ४८ हजार मते कमी पडली. पण, पाच महिन्यांनंतर विधानसभा निवडणूकीत त्याच मतदारांनी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने मला निवडून दिले. म्हणजे मी तिकडे काही गडबड केली असा अर्थ होतो का? लोकसभा निवडणुकीला वर्ष उलटले, विधानसभा निवडणूक होऊन नऊ महिने झाले, विरोधकांनी दिलदारपणे पराभव स्वीकारला पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी विरोधकांना दिला.

आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही

एका पत्त्यावर अनेक मतदार राहात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ही बाब आयोगाने पडताळून, पाहायला वी. तसे नसेल तर ते स्पष्ट केले पाहिजे, पण चूक असेल तर तसेही आयोगाने स्पष्ट केले पाहिजे. आयोगाच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ज्यांचा अधिकार आहे त्यांनी उत्तर द्यायला हवे. लोकशाहीत विविध पक्ष आपले मत मांडू शकतात म्हणजे आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, निवडणुर्कीपूर्वी तीन-चार ईव्हीएममध्ये फेरफार करून मते वाढवून देण्याचा दावा काही लोक करत होते. पण ते सर्व फसवणुकीचे प्रकार होते. काही त्याला बळी पडतात. जनतेच्या मनात कुणाला सत्तेवर बसवायचे, कुणाला हटवायचे हे ठरलेले असते, तसे ती करते. अनेक वर्षे देशात-राज्यात काँग्रेसचे सरकार होते, जनतेने ते बदलले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना अभूतपूर्व यश मिळाले, तेव्हा आयोग ठीक काम करत होता. आता त्यांचा दारुण पराभव झाला, तेव्हा आयोगाबद्दल आरोप केले जात आहेत, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी