शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:50 IST

NCP Deputy CM Ajit Pawar News: आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही. विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

NCP Deputy CM Ajit Pawar News: पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना, मी बारामतीतून सलग निवडणूका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही. लोकांची कामे केली तर लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीकडून नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांकडे काहीही मुद्दे राहिले नसल्याने ईव्हीएमनंतर आता मतदारयाद्यांचा विषय उकरून काढण्यात आला आहे. विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा आयोगाचा काहीही दोष नसतो, पण पराभव झाल्यानंतर तो पचविता येत नसल्याने असे आरोप होत आहेत, या शब्दांत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी

देशात काही मोजक्या संस्था आहेत ज्यांना संविधानाने स्वायत्तता देण्यात आली आहे. निवडणूक आयोग त्यापैकीच एक आहे. आयोगावर होत असलेल्या आरोपांत तथ्य आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात आमच्या उमेदवाराला ४८ हजार मते कमी पडली. पण, पाच महिन्यांनंतर विधानसभा निवडणूकीत त्याच मतदारांनी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने मला निवडून दिले. म्हणजे मी तिकडे काही गडबड केली असा अर्थ होतो का? लोकसभा निवडणुकीला वर्ष उलटले, विधानसभा निवडणूक होऊन नऊ महिने झाले, विरोधकांनी दिलदारपणे पराभव स्वीकारला पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी विरोधकांना दिला.

आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही

एका पत्त्यावर अनेक मतदार राहात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ही बाब आयोगाने पडताळून, पाहायला वी. तसे नसेल तर ते स्पष्ट केले पाहिजे, पण चूक असेल तर तसेही आयोगाने स्पष्ट केले पाहिजे. आयोगाच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ज्यांचा अधिकार आहे त्यांनी उत्तर द्यायला हवे. लोकशाहीत विविध पक्ष आपले मत मांडू शकतात म्हणजे आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, निवडणुर्कीपूर्वी तीन-चार ईव्हीएममध्ये फेरफार करून मते वाढवून देण्याचा दावा काही लोक करत होते. पण ते सर्व फसवणुकीचे प्रकार होते. काही त्याला बळी पडतात. जनतेच्या मनात कुणाला सत्तेवर बसवायचे, कुणाला हटवायचे हे ठरलेले असते, तसे ती करते. अनेक वर्षे देशात-राज्यात काँग्रेसचे सरकार होते, जनतेने ते बदलले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना अभूतपूर्व यश मिळाले, तेव्हा आयोग ठीक काम करत होता. आता त्यांचा दारुण पराभव झाला, तेव्हा आयोगाबद्दल आरोप केले जात आहेत, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी