शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:50 IST

NCP Deputy CM Ajit Pawar News: आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही. विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

NCP Deputy CM Ajit Pawar News: पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना, मी बारामतीतून सलग निवडणूका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही. लोकांची कामे केली तर लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीकडून नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांकडे काहीही मुद्दे राहिले नसल्याने ईव्हीएमनंतर आता मतदारयाद्यांचा विषय उकरून काढण्यात आला आहे. विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा आयोगाचा काहीही दोष नसतो, पण पराभव झाल्यानंतर तो पचविता येत नसल्याने असे आरोप होत आहेत, या शब्दांत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी

देशात काही मोजक्या संस्था आहेत ज्यांना संविधानाने स्वायत्तता देण्यात आली आहे. निवडणूक आयोग त्यापैकीच एक आहे. आयोगावर होत असलेल्या आरोपांत तथ्य आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात आमच्या उमेदवाराला ४८ हजार मते कमी पडली. पण, पाच महिन्यांनंतर विधानसभा निवडणूकीत त्याच मतदारांनी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने मला निवडून दिले. म्हणजे मी तिकडे काही गडबड केली असा अर्थ होतो का? लोकसभा निवडणुकीला वर्ष उलटले, विधानसभा निवडणूक होऊन नऊ महिने झाले, विरोधकांनी दिलदारपणे पराभव स्वीकारला पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी विरोधकांना दिला.

आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही

एका पत्त्यावर अनेक मतदार राहात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ही बाब आयोगाने पडताळून, पाहायला वी. तसे नसेल तर ते स्पष्ट केले पाहिजे, पण चूक असेल तर तसेही आयोगाने स्पष्ट केले पाहिजे. आयोगाच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ज्यांचा अधिकार आहे त्यांनी उत्तर द्यायला हवे. लोकशाहीत विविध पक्ष आपले मत मांडू शकतात म्हणजे आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, निवडणुर्कीपूर्वी तीन-चार ईव्हीएममध्ये फेरफार करून मते वाढवून देण्याचा दावा काही लोक करत होते. पण ते सर्व फसवणुकीचे प्रकार होते. काही त्याला बळी पडतात. जनतेच्या मनात कुणाला सत्तेवर बसवायचे, कुणाला हटवायचे हे ठरलेले असते, तसे ती करते. अनेक वर्षे देशात-राज्यात काँग्रेसचे सरकार होते, जनतेने ते बदलले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना अभूतपूर्व यश मिळाले, तेव्हा आयोग ठीक काम करत होता. आता त्यांचा दारुण पराभव झाला, तेव्हा आयोगाबद्दल आरोप केले जात आहेत, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी