शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:50 IST

NCP Deputy CM Ajit Pawar News: आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही. विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

NCP Deputy CM Ajit Pawar News: पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना, मी बारामतीतून सलग निवडणूका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही. लोकांची कामे केली तर लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीकडून नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांकडे काहीही मुद्दे राहिले नसल्याने ईव्हीएमनंतर आता मतदारयाद्यांचा विषय उकरून काढण्यात आला आहे. विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा आयोगाचा काहीही दोष नसतो, पण पराभव झाल्यानंतर तो पचविता येत नसल्याने असे आरोप होत आहेत, या शब्दांत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी

देशात काही मोजक्या संस्था आहेत ज्यांना संविधानाने स्वायत्तता देण्यात आली आहे. निवडणूक आयोग त्यापैकीच एक आहे. आयोगावर होत असलेल्या आरोपांत तथ्य आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात आमच्या उमेदवाराला ४८ हजार मते कमी पडली. पण, पाच महिन्यांनंतर विधानसभा निवडणूकीत त्याच मतदारांनी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने मला निवडून दिले. म्हणजे मी तिकडे काही गडबड केली असा अर्थ होतो का? लोकसभा निवडणुकीला वर्ष उलटले, विधानसभा निवडणूक होऊन नऊ महिने झाले, विरोधकांनी दिलदारपणे पराभव स्वीकारला पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी विरोधकांना दिला.

आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही

एका पत्त्यावर अनेक मतदार राहात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ही बाब आयोगाने पडताळून, पाहायला वी. तसे नसेल तर ते स्पष्ट केले पाहिजे, पण चूक असेल तर तसेही आयोगाने स्पष्ट केले पाहिजे. आयोगाच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ज्यांचा अधिकार आहे त्यांनी उत्तर द्यायला हवे. लोकशाहीत विविध पक्ष आपले मत मांडू शकतात म्हणजे आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, निवडणुर्कीपूर्वी तीन-चार ईव्हीएममध्ये फेरफार करून मते वाढवून देण्याचा दावा काही लोक करत होते. पण ते सर्व फसवणुकीचे प्रकार होते. काही त्याला बळी पडतात. जनतेच्या मनात कुणाला सत्तेवर बसवायचे, कुणाला हटवायचे हे ठरलेले असते, तसे ती करते. अनेक वर्षे देशात-राज्यात काँग्रेसचे सरकार होते, जनतेने ते बदलले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना अभूतपूर्व यश मिळाले, तेव्हा आयोग ठीक काम करत होता. आता त्यांचा दारुण पराभव झाला, तेव्हा आयोगाबद्दल आरोप केले जात आहेत, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी