शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:13 IST

सांगोल्यात धनगर समजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीमधील २० हून अधिक नेते भाजपमध्ये दाखल झाले असून काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हाच धक्का आता महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला बसण्याची शक्यता.

भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी असुद्दीन ओवेसी यांच्या सोबतीने दलित-मुस्लीम एकी घडवून वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना केली. त्यात धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना घेत धनगर समाजाला सोबत घेतले. परंतु, पडळकरच पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर शेतकरी कामगार पक्षात जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी कामगार पक्ष आधीच आघाडीसोबत आहे. त्यामुळे पडळकर अप्रत्यक्षरित्य आघाडीतच जाणार आहेत.

सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. देशमुख यांनी सांगोल्यातून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी तब्बल ५५ वर्षे सांगोला मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. सांगोला मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला राहिला आहे. गणपतराव देशमुख यांनी १९६२ मध्ये पहिल्यांदा सांगोल्यातून विधानसभा निवडणूक लढवली होती. केवळ १९७२ आणि १९९५ मध्ये त्यांना येथून पराभव पत्करावा लागला होता.

शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गोपीचंद पडळकर इच्छूक आहेत. वंचितकडून विधानसभेला निवडून येण्याची शाश्वती नसल्यामुळेच पडळकर शेकापमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. पडळकर लोकसभा निवडणुकीपासून वंचित बहुजन आघाडीसोबत आहेत. त्यांनी सांगली मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान सांगोल्यात धनगर समजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.