शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

वंचित आघाडीला मुस्लीम मते कमी प्रमाणात मिळाली - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 02:56 IST

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू

अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळे या आघाडीची ताकद सर्वांनाच दिसली आहे. मात्र औरंगाबाद वगळता इतरत्र मुस्लीम समाजाची मते कमी प्रमाणात मिळाली, असे आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमसंदर्भात संशयाचे धुके कायमच असून, त्या विरोधात आता लढा देण्याचे ठरविले आहे. इतर पक्षांनी त्याचे समर्थन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आघाडी व युतीच्या राजकारणात संघटनेची माती होते. जागा वाटपाच्या मुद्दामुळे अनेक कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही. त्याचा परिणाम संघटनेवर होतो. काँग्रेस त्याचे उत्तम उदाहरण आहे. जागा वाटपाच्या याच गुंत्यामुळे काँग्रेस पक्षाची स्थिती आता केवळ ‘एनजीओ’ सारखीच राहील, असे आंबेडकर म्हणाले.

राजू शेट्टींचे स्वागत आहेराजू शेट्टींना वंचित सोबत येण्याचे निमंत्रण आम्ही दिले होते; परंतु ते काँग्रेस आघाडीसोबत गेले.आता विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

...तर राज ठाकरेंना सुवर्णसंधीविधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर