शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

वंचित आघाडीला मुस्लीम मते कमी प्रमाणात मिळाली - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 02:56 IST

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू

अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळे या आघाडीची ताकद सर्वांनाच दिसली आहे. मात्र औरंगाबाद वगळता इतरत्र मुस्लीम समाजाची मते कमी प्रमाणात मिळाली, असे आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमसंदर्भात संशयाचे धुके कायमच असून, त्या विरोधात आता लढा देण्याचे ठरविले आहे. इतर पक्षांनी त्याचे समर्थन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आघाडी व युतीच्या राजकारणात संघटनेची माती होते. जागा वाटपाच्या मुद्दामुळे अनेक कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही. त्याचा परिणाम संघटनेवर होतो. काँग्रेस त्याचे उत्तम उदाहरण आहे. जागा वाटपाच्या याच गुंत्यामुळे काँग्रेस पक्षाची स्थिती आता केवळ ‘एनजीओ’ सारखीच राहील, असे आंबेडकर म्हणाले.

राजू शेट्टींचे स्वागत आहेराजू शेट्टींना वंचित सोबत येण्याचे निमंत्रण आम्ही दिले होते; परंतु ते काँग्रेस आघाडीसोबत गेले.आता विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

...तर राज ठाकरेंना सुवर्णसंधीविधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर