शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वंचित आघाडीला मुस्लीम मते कमी प्रमाणात मिळाली - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 02:56 IST

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू

अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळे या आघाडीची ताकद सर्वांनाच दिसली आहे. मात्र औरंगाबाद वगळता इतरत्र मुस्लीम समाजाची मते कमी प्रमाणात मिळाली, असे आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमसंदर्भात संशयाचे धुके कायमच असून, त्या विरोधात आता लढा देण्याचे ठरविले आहे. इतर पक्षांनी त्याचे समर्थन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आघाडी व युतीच्या राजकारणात संघटनेची माती होते. जागा वाटपाच्या मुद्दामुळे अनेक कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही. त्याचा परिणाम संघटनेवर होतो. काँग्रेस त्याचे उत्तम उदाहरण आहे. जागा वाटपाच्या याच गुंत्यामुळे काँग्रेस पक्षाची स्थिती आता केवळ ‘एनजीओ’ सारखीच राहील, असे आंबेडकर म्हणाले.

राजू शेट्टींचे स्वागत आहेराजू शेट्टींना वंचित सोबत येण्याचे निमंत्रण आम्ही दिले होते; परंतु ते काँग्रेस आघाडीसोबत गेले.आता विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

...तर राज ठाकरेंना सुवर्णसंधीविधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर