शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कुंभामुळे गोदाप्रदूषणात वाढ

By admin | Updated: October 30, 2015 01:20 IST

सिंहस्थ कुंंभमेळाव्यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचे

मुंबई : सिंहस्थ कुंंभमेळाव्यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राला (निरी) दिले. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध प्रा. एच. एम. देसरडा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेबाबत न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याच अनुषंगाने गोदावरीच्या नदीच्या प्रदूषणाबाबत दाखल अन्य एका याचिकेचा संदर्भ देत राज्य सरकार व नाशिक महापालिकेने ते रोखण्यासाठी योग्य कार्यवाही न केल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याच्या कालावधीत गोदावरी नदी घाण झाल्याने ती स्वच्छ करण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात कार्यकारी अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. मात्र, या पत्रावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. यावेळी खंडपीठाने नमूद केले की, राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिकेला वारंवार आदेश देऊन ‘निरी’च्या मदतीने गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुंंभमेळ्यामुळे पुन्हा पाणी घाण झाले आहे, त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने नदीची पाहणी करून उपाययोजना आखण्याचे निर्देश न्यायालयाने निरीला दिले. त्याचबरोबर यापुढे नदीच्या प्रदूषणात वाढ होऊ नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची सूचनाही न्यायालयाने केली. यावर पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)