शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूवरील फवारणी कुचकामी

By admin | Updated: November 4, 2014 01:00 IST

शहरात डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत २५८ जणांना हा रोग झाला असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वात जास्त लहान मुले आहेत. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या

एडिस डासांच्या अळ्या मरतच नाही : नागरिकांच्या जीवाशी खेळसुमेध वाघमारे - नागपूरशहरात डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत २५८ जणांना हा रोग झाला असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वात जास्त लहान मुले आहेत. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने डासरोधक ‘अबेट’ या कीटकनाशकाची फवारणी केली जात आहे. परंतु या कीटकनाशकामुळे डेंग्यू डासांच्या अळ्या मरतच नसल्याची धक्कादायक माहिती आहे. अशा कीटकनाशकाची फवारणी करून मनपा नागरिकांच्या जीवाशी खेळ तर खेळत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.डेंग्यूच्या रोगाने लोकांना हादरवून सोडले आहे. या रोगाला एडिस इजिप्ती जातीचा डास कारणीभूत आहे. हा डास आपले प्रजनन स्वच्छ पाण्यात करतो. यासाठी टाक्या, कूलर, फुलदाणी, कुंड्या, टायर्समध्ये साचलेल्या पाण्याची मदत घेतो. यावर उपाय म्हणून मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी घराघरांना भेटी देत या साहित्याची तपासणी करीत आहे. या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत ३ लाख ७० हजार ४५७ घरांची तपासणी करण्यात आली. त्यातील ११ हजार ४८५ घरांत डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. हे कर्मचारी घरमालकांकडून पाण्याची विल्हेवाट लावतात. जिथे पाणी फेकणे शक्य नाही त्या पाण्यात डासनाशक अबेट औषध टाकतात. परंतु या औषधामुळे डासांच्या अळ्याच मरत नसल्याचे खुद्द कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही फवारणी निव्वळ धूळफेक ठरत आहे. यामुळे उघड्या पाण्याचा साठा, डबके डेंग्यूच्या उत्पत्तीचे केंद्र ठरत आहे. मलेरिया, डेंग्यू व मेंदूज्वर पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी अबेट नावाची कीटकनाशक फवारणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. एक लिटर पाण्यात २० एमएल अबेट टाकून ते डासांच्या अळ्या असलेल्या पाण्यात टाकले जाते. परंतु या औषधाने डेंग्यू डासांच्या स्टेज तीन आणि चारमधील अळ्या मरत नसल्याचे आढळून आले. विशेषत: डास तयार होण्यापूर्वी ‘प्युपा’नावाच्या स्टेजमध्ये याचा प्रभावच दिसून येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘अबेट’ची किंमत प्रति लिटर १२०० रुपये आहे. शहराला महिन्याकाठी हे औषध ३० लिटरपेक्षा जास्त लागते. मात्र या औषधाचा प्रभावच पडत नसल्याने यावर होणाऱ्या खर्चावर पाणी फेरले जात आहे.(प्रतिनिधी)