शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजपा सरकारविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:01 IST

जनतेला मोठीमोठी आश्वासने आणि भूलथापा देऊन केंद्रात आणि नंतर राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे.

ठाणे : एनडीए सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनता बेहाल झाली आहे. चोर, लुटारू मालामाल झाले असल्याचा आरोप करून, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये भाजपा सरकारविरोधात बुधवारी निदर्शने करण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनएकता-जनअधिकार-जनआंदोलन या बॅनरखाली विविध संघटनांनी जोरदार घोषणाबाजीतून भाजपावर हल्लाबोल करून निदर्शने केली. याप्रसंगी महिलांची संख्या अधिक होती. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर भविष्यात ‘भारत बंद’ची हाक दिली जाऊ शकते, असे विश्वास उटगी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जनतेला मोठीमोठी आश्वासने आणि भूलथापा देऊन केंद्रात आणि नंतर राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत हे सरकार सर्व क्षेत्रांत अपयशी ठरलेले आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार, नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बेकारीत वाढ होत आहे, तसेच महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाल्याने रोजगारांमध्ये घट झाली. जीएसटीमुळे महागाई वाढली. इन्कम टॅक्स, कॉर्पाेरेट टॅक्समध्ये सवलती देऊन श्रीमंतांनाच फायदा झालेला आहे. नोटाबंदी करून अब्जावधींचा काळा पैसा पांढरा करण्याची नामी संधी या सरकारने उपलब्ध करून भ्रष्टाचाºयांना अभय दिले. या व्यतिरिक्त आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा विकास, उद्योग, शेती इ. क्षेत्रांमधील अनागोंदी कारभारामुळे जनता त्रस्त झालेली आहे. शेतकºयांच्या हालअपेष्टा वाढलेल्या आहेत. कर्जमाफी आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतीमालाला भाव देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता होत नाही. अंगणवाडी कर्मचाºयांना दिलेल्या मानधनवाढीचे आश्वासन पाळले गेले नाही. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ यासारख्या घोषणा करूनही नवीन उद्योग फारसे निघालेले नाही. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्टÑ राज्य किसान सभा, भारतीय महिला फेडरेशन, समृद्धी महामार्गविरोधी किसान संघर्ष समिती, सर्व श्रमिक संघ, आयटक,स्वराज शेतकरी,महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आदी संघटनांनी सहभागी होऊन निदर्शने केली. विश्वास उटगी यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.यापुढे ‘भारत बंद’ आंदोलन : पत्रकारांशी बोलताना उटगी यांनी सांगितले की, येत्या २६ मे ला भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत, तर यांच्यामुळे चोर, लुटारू मालामाल झाले आहे, तसेच ते राज्यघटनेची मोडतोड करून लोकशाहीचा खून करत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी, तसेच सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी देशभर १०६ संघटना एकत्र आल्या आहेत. यापुढे ‘भारत बंद’ आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र