शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

भाजपा सरकारविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:01 IST

जनतेला मोठीमोठी आश्वासने आणि भूलथापा देऊन केंद्रात आणि नंतर राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे.

ठाणे : एनडीए सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनता बेहाल झाली आहे. चोर, लुटारू मालामाल झाले असल्याचा आरोप करून, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये भाजपा सरकारविरोधात बुधवारी निदर्शने करण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनएकता-जनअधिकार-जनआंदोलन या बॅनरखाली विविध संघटनांनी जोरदार घोषणाबाजीतून भाजपावर हल्लाबोल करून निदर्शने केली. याप्रसंगी महिलांची संख्या अधिक होती. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर भविष्यात ‘भारत बंद’ची हाक दिली जाऊ शकते, असे विश्वास उटगी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जनतेला मोठीमोठी आश्वासने आणि भूलथापा देऊन केंद्रात आणि नंतर राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत हे सरकार सर्व क्षेत्रांत अपयशी ठरलेले आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार, नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बेकारीत वाढ होत आहे, तसेच महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाल्याने रोजगारांमध्ये घट झाली. जीएसटीमुळे महागाई वाढली. इन्कम टॅक्स, कॉर्पाेरेट टॅक्समध्ये सवलती देऊन श्रीमंतांनाच फायदा झालेला आहे. नोटाबंदी करून अब्जावधींचा काळा पैसा पांढरा करण्याची नामी संधी या सरकारने उपलब्ध करून भ्रष्टाचाºयांना अभय दिले. या व्यतिरिक्त आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा विकास, उद्योग, शेती इ. क्षेत्रांमधील अनागोंदी कारभारामुळे जनता त्रस्त झालेली आहे. शेतकºयांच्या हालअपेष्टा वाढलेल्या आहेत. कर्जमाफी आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतीमालाला भाव देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता होत नाही. अंगणवाडी कर्मचाºयांना दिलेल्या मानधनवाढीचे आश्वासन पाळले गेले नाही. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ यासारख्या घोषणा करूनही नवीन उद्योग फारसे निघालेले नाही. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्टÑ राज्य किसान सभा, भारतीय महिला फेडरेशन, समृद्धी महामार्गविरोधी किसान संघर्ष समिती, सर्व श्रमिक संघ, आयटक,स्वराज शेतकरी,महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आदी संघटनांनी सहभागी होऊन निदर्शने केली. विश्वास उटगी यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.यापुढे ‘भारत बंद’ आंदोलन : पत्रकारांशी बोलताना उटगी यांनी सांगितले की, येत्या २६ मे ला भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत, तर यांच्यामुळे चोर, लुटारू मालामाल झाले आहे, तसेच ते राज्यघटनेची मोडतोड करून लोकशाहीचा खून करत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी, तसेच सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी देशभर १०६ संघटना एकत्र आल्या आहेत. यापुढे ‘भारत बंद’ आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र