शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिल्ली शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारी राजधानी : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:48 IST

काही शहरांचा शेतकऱ्यांचे पैसे थकविण्यात नावलौकिक आहे. जुन्नरसह आणखी काही शेतकऱ्यांचे शेतीमालाचे पैसे दिल्लीतील बाजारपेठेतून मिळालेले नाहीत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून याबाबत अधिक कडक कायदे करावेकेंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांना अनुदान मिळण्यास अडचणी आॅक्टोबर महिन्यात याबाबत इटली,फान्स,जर्मनी आदी देशांना मी स्वत:भेट देणार

पुणे : काही शहरांचा पैसे थकविण्यात नावलैकिक आहे. दिल्लीच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी पाठविलेल्या शेती मालाचे पैसे थकविले जातात. त्यामुळे देशाच्या राजधानीचाही यात समावेश आहे की काय? अशी शंका येत आहे. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून याबाबत अधिक कडक कायदे करावे लागतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दर्जेदार द्राक्ष निर्यात करणारा देश म्हणून भारताने विश्वास संपादन करावा असेही पवार यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५८ व्या वार्षिक मेळाव्या उद्घाटन समारंभ प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार महेंद्र शाहीर, कैलास भोसले आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, काही शहरांचा शेतकऱ्यांचे पैसे थकविण्यात नावलौकिक आहे. जुन्नरसह आणखी काही शेतकऱ्यांचे शेतीमालाचे पैसे दिल्लीतील बाजारपेठेतून मिळालेले नाहीत. मी दिल्लीत असताना अनेक शेतकरी याबाबत तक्रारी घेवून येतात. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळाले पाहिजेत.याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असून या संदर्भात अधिक कडक कायदे तयार करावे लागतील.राज्यातील द्राक्षाचे क्षेत्र वाढत चालेले तशा समस्याही वाढत आहेत.शेतक-यांच्या अडचणी शास्त्रज्ञांना समजल्या पाहिजेत.तसेच शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचले पाहिजे.त्यातून द्राक्षाची गुणवत्ता वाढेल व उत्पादनातही वाढ होईल,असे स्पष्ट करून पवार म्हणाले,द्राक्षाच्या निर्यातीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाबरोबर बैठक घेवून त्यावर मार्गदर्शन व सहकार्य मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांना अनुदान मिळण्यास अडचणी येत असली तर त्यासाठीही पाठपुरावा केला जाईल.द्राक्षाचा विचार करता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अजूनही भारताचा वाटा ६ ते ७ टक्क्यांच्या आत आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता असून दजेर्दार वाण वाढवून भारताने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्वत:चा विश्वास निर्माण करायला हवा.त्याचप्रमाणे ऊसाला पर्यायी पिक घेण्याबाबत विचार सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात याबाबत इटली,फान्स,जर्मनी आदी देशांना मी स्वत:भेट देणार आहे.सोपान कांचन म्हणाले, केंद्र शासनाच्या संस्थांचा महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. महाराष्ट्रा ऐवजी दुसऱ्या राज्यांना निधी दिला जात आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत आहेत.दरम्यान कार्यक्रमात द्राक्षवृत्त या अंकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते केले. सुभाष आर्वे यांनी प्रास्ताविक तर कैलास भोसले यांनी आभार मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार