शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

राजकारणाची व्याख्या व्यापक हवी, कुरघोडीचे राजकारण नको - नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 17:08 IST

"राजकारण हे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्याकरिता असावे. राजकारणाची व्याख्या आता व्यापक होणे अत्यंत आवश्यक आहे. कुरघोडी व केवळ पदाकरिता राजकारण बंद होण्याची गरज आहे" 

नागपूर  : "राजकारण हे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्याकरिता असावे. राजकारणाची व्याख्या आता व्यापक होणे अत्यंत आवश्यक आहे. कुरघोडी व केवळ पदाकरिता राजकारण बंद होण्याची गरज आहे," असे प्रतिपादन आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी येथे केले.  विधीमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहात आज राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने राज्यातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी “राज्यशास्त्र व लोक प्रशासन’ विषयावर आयोजित संसदीय अभ्यासवर्गात “ विधी मंडळाचे विशेषाधिकार : सुप्रशासनासाठी महत्वपूर्ण आयुध”  या विषयावर  त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

'प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असावा. लोकांचे दैनंदिन जीवनातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर असला पाहिजे. हे काम करित असतांना त्यांना शासकीय अधिकारी वा कार्यालयांकडून योग्य ती वागणूक मिळावी यासाठी विधीमंडळाच्या वतीने काही अधिकार दिलेले आहेत. सुप्रशासनाची राज्यात खात्री व्हावी या उद्देशाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच लोकसेवा हमी विधेयक आणले आहे. यामुळे शासनाची धेय्य धोरणे आणि विविध योजनांची सुयोग्य अंमलबजावणी होण्याच्या दिशेने आता योग्य ती वाटचाल होत आहे.  आता अगदी तालुका स्तरावरदेखील योजनांची सूत्रबद्ध अंमलबजावणी होण्याची शाश्वती निर्माण झाली आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व सकारात्मक होणे आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या.

लोकांना योग्य प्रकारे सेवा मिळण्याकरिता महत्वाचे आयुध आहे. यालाच विशेषाधिकार असे संबोधले जाते. विशेष अधिकाराच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यास चालना मिळाली तर लोकप्रतिनिधी मार्फत अधिवेशनाखेरीजही काम अधिक सोपे होईल. या उद्देशाने सन २०१५ पासून राज्यभर माहिती कार्यशाळा विशेष हक्क समितीच्या वतीने घेण्यात येत आहेत. अनेकदा कार्यक्रमाना लोकप्रतिनिधीना न बोलावणे, टाळणे याला हक्कभंग म्हणतात. याबाबीची माहिती देण्यात येते.'  

विकास प्रक्रियेबाबत बोलतांना त्या म्हणाल्या, 'जागतिक पातळीवर जाहिर करण्यात अालेल्या सहस्रक विकास व शाश्वत विकास उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत पोचण्याकरिता आपल्याकडे तेवढया प्रमाणात अजून जाणीवजागृती झालेली नाही. त्यामुळे त्याला पूरक असे कार्यक्रम अजून दिसत नाहीत याचे प्रमुख कारण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व अंमलबजावणीची यंत्रणा दुर्बल असणे ही होत. समितीच्या वतीने या सर्व विषयांवर काम करण्यात येत आहे.'  यावेळी विशेष हक्क समितीच्या कार्याबाबत विधीमंडळाचे उपसचिव नंदलाल काळे यांनी माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार व माध्यम संशोधक अभिनंदन थोरात यांनी वक्त्यांचे स्वागत व परिचय करुन दिला. विधानमंडळातचे सचिव अनंत कळसे,  अवर सचिव उमेश शिंदे,राष्ट्रकुल मंडऴाचे सुनिल झोरे आदि मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे