शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राजकारणाची व्याख्या व्यापक हवी, कुरघोडीचे राजकारण नको - नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 17:08 IST

"राजकारण हे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्याकरिता असावे. राजकारणाची व्याख्या आता व्यापक होणे अत्यंत आवश्यक आहे. कुरघोडी व केवळ पदाकरिता राजकारण बंद होण्याची गरज आहे" 

नागपूर  : "राजकारण हे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्याकरिता असावे. राजकारणाची व्याख्या आता व्यापक होणे अत्यंत आवश्यक आहे. कुरघोडी व केवळ पदाकरिता राजकारण बंद होण्याची गरज आहे," असे प्रतिपादन आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी येथे केले.  विधीमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहात आज राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने राज्यातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी “राज्यशास्त्र व लोक प्रशासन’ विषयावर आयोजित संसदीय अभ्यासवर्गात “ विधी मंडळाचे विशेषाधिकार : सुप्रशासनासाठी महत्वपूर्ण आयुध”  या विषयावर  त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

'प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असावा. लोकांचे दैनंदिन जीवनातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर असला पाहिजे. हे काम करित असतांना त्यांना शासकीय अधिकारी वा कार्यालयांकडून योग्य ती वागणूक मिळावी यासाठी विधीमंडळाच्या वतीने काही अधिकार दिलेले आहेत. सुप्रशासनाची राज्यात खात्री व्हावी या उद्देशाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच लोकसेवा हमी विधेयक आणले आहे. यामुळे शासनाची धेय्य धोरणे आणि विविध योजनांची सुयोग्य अंमलबजावणी होण्याच्या दिशेने आता योग्य ती वाटचाल होत आहे.  आता अगदी तालुका स्तरावरदेखील योजनांची सूत्रबद्ध अंमलबजावणी होण्याची शाश्वती निर्माण झाली आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व सकारात्मक होणे आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या.

लोकांना योग्य प्रकारे सेवा मिळण्याकरिता महत्वाचे आयुध आहे. यालाच विशेषाधिकार असे संबोधले जाते. विशेष अधिकाराच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यास चालना मिळाली तर लोकप्रतिनिधी मार्फत अधिवेशनाखेरीजही काम अधिक सोपे होईल. या उद्देशाने सन २०१५ पासून राज्यभर माहिती कार्यशाळा विशेष हक्क समितीच्या वतीने घेण्यात येत आहेत. अनेकदा कार्यक्रमाना लोकप्रतिनिधीना न बोलावणे, टाळणे याला हक्कभंग म्हणतात. याबाबीची माहिती देण्यात येते.'  

विकास प्रक्रियेबाबत बोलतांना त्या म्हणाल्या, 'जागतिक पातळीवर जाहिर करण्यात अालेल्या सहस्रक विकास व शाश्वत विकास उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत पोचण्याकरिता आपल्याकडे तेवढया प्रमाणात अजून जाणीवजागृती झालेली नाही. त्यामुळे त्याला पूरक असे कार्यक्रम अजून दिसत नाहीत याचे प्रमुख कारण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व अंमलबजावणीची यंत्रणा दुर्बल असणे ही होत. समितीच्या वतीने या सर्व विषयांवर काम करण्यात येत आहे.'  यावेळी विशेष हक्क समितीच्या कार्याबाबत विधीमंडळाचे उपसचिव नंदलाल काळे यांनी माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार व माध्यम संशोधक अभिनंदन थोरात यांनी वक्त्यांचे स्वागत व परिचय करुन दिला. विधानमंडळातचे सचिव अनंत कळसे,  अवर सचिव उमेश शिंदे,राष्ट्रकुल मंडऴाचे सुनिल झोरे आदि मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे