शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
4
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
5
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
6
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
7
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
8
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
9
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
10
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
11
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
12
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
13
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
14
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
15
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
16
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
17
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
18
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
19
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
20
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पिरवपैकी डुबलवाडीत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: May 6, 2014 20:49 IST

नळ योजनेचे वीज बिल थकीत, नैसर्गिक पाण्याचा स्रोत कमी झाल्याने गैरसोय

नळ योजनेचे वीज बिल थकीत, नैसर्गिक पाण्याचा स्रोत कमी झाल्याने गैरसोय
टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

राधानगरी : नदीवरील नळ योजनेचे वीज बिल थकल्याने ती बंद, तर नैसर्गिक पाण्याचा स्रोत कमी झाल्याने ती कुचकामी अशी स्थिती झाल्याने राधानगरी तालुक्यातील पिरळपैकी डुबलवाडी येथे तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. पिण्यासाठी पाणी मिळविणेही मुश्कील होत आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथून जवळच असलेल्या पिरळ ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या कामेवाडी व डुबलवाडी या प्रत्येकी तीस-चाळीस घरांच्या दोन-अडीचशे वस्तीच्या दोन स्वतंत्र वाड्या आहेत. उंच डोंगरावर दुर्गमानवाडच्या कड्याजवळ असलेल्या वाड्या मूळ गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर वसलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण प्रचंड असले तरी डोंगर उतार असल्याने पाणी साचून राहत नाही. परिणामी उन्हाळ्यातील काही महिने पाण्यासाठी वणवण करणे हा येथील लोकांच्या जीवनाचा एक भागच बनला आहे.
१९९६ मध्ये पिरळ येथे सुमारे पाऊणकोटी खर्चाची भोगावती नदीवरील नळपाणी योजना करण्यात आली. गावाशेजारी टेकडीवर साठवण टाकी बांधून त्यात नदीतील पाणी सोडण्यात आले. येथून पिरळ, सावर्धन, चौगलेवाडी येथून पाणी पुरविले जात आहे. याचवेळी डुबलवाडी व कामेवाडीसाठी याच टाकीतून पाणी उपसा करून पूरक नळयोजना केली. यासाठी दहा अश्वशक्तीचा मोटर पंप बसविण्यात आला. काही वर्षे ही योजना सुरू राहिली, पण विजेचे बिल युनिटवर आकारणी सुरू झाल्यावर हा अंगापेक्षा भोंगा मोठा अशी स्थिती झाली. लोकवस्तीच्या मानाने होणारे प्रचंड वीज बिल भरणे आवाक्याबाहेर गेल्याने ग्रामपंचायतीने ही पूरक योजनाच बंद केली. सध्या येथे आठ-दहा लाख वीज बिल थकीत असल्याचे समजते.
दोन वर्षांपूर्वी पेयजल योजनेतून या दोन वाड्यासाठी नैसर्गिक झर्‍यापासून पाणी पुरविणारी नळयोजना करण्यात आली. यासाठी ६९ लाख रुपये खर्च करण्यात आले. यासाठी दुर्गमानवाड डोंगरातून दोन-अडीच किमी अंतरावरून पाईपद्वारे प्रथम कामेवाडी व तेथून डुबलवाडी येथे पाणी आणण्यात आले. पावसाळ्यापासून आठ महिने यातून पुरेसा पाणीपुरवठा होतो, पण उन्हाळा सुरू झाल्यावर पाणी कमी होते. सध्या मिळणारे पाणी कामेवाडी येथील लोकांना कसे तरी पुरते. त्यापुढे ते येतच नाही. परिणामी डुबलवाडीत गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळालेले नाही. यामुळे येथील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. येथील एका खासगी विहिरीचा लोकांना आधार होता, पण तेथेही आता पाणी कमी झाले आहे.
वीस वर्षांत दोन पाणी योजनावर दीड कोटीचा निधी खर्च होऊनही या दोन वाड्याना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी किरण गौतम यांना याबाबत निवेदन दिले आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
प्रतिनिधी

प्रतिक्रिया
या वाड्यातील पाणीप˜ी व वीज बिल यामध्ये मोठा फरक आहे. ग्रामपंचायतीलाही ही रक्कम भरणे पेलणार नाही. त्यामुळे जुनी योजना बंद आहे. नव्या योजनेत पाण्याचा स्रोत कमी झाल्याने अडचण आहे.
सिंधुताई अशोक पाटील, सरपंच ग्रा. पं. पिरळ
-----

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार पाहणी करण्यात आली. दुर्गमानवाड येथील एका खासगी क्षेत्रातील नैसर्गिक झर्‍याचे पाणी शेतीसाठी वापरण्यात येते. यातील पाणी पिकासाठी अधिगृहीत करण्याबाबत तहसीलदार यांच्या आदेशाने कारवाई करण्यात येईल.
किरण गौतम, गटविकास अधिकारी.