शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांना पद्मश्री समर्पित

By admin | Updated: January 26, 2016 03:16 IST

दहशतवादी हल्ले, हत्या आणि बलात्काराच्या केससमध्ये आत्तापर्यंत ३८ जणांना फाशी आणि ६२८ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

मुंबई : दहशतवादी हल्ले, हत्या आणि बलात्काराच्या केससमध्ये आत्तापर्यंत ३८ जणांना फाशी आणि ६२८ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्काराबाबत तपास यंत्रणा आणि निर्भीड साक्षीदारांचे आभार मानत अ‍ॅड. निकम यांनी हा पुरस्कार त्यांच्या आई-वडिलांना समर्पित केला आहे. आपल्या आई-वडिलांमधील धाडस आणि शिस्त हे गुण आपल्याला वकिली व्यवसायात अत्यंत उपयोगी ठरले, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. निकम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. १९९३ चा साखळी बॉम्बस्फोट आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपल्या केसची सुरुवात व अंत संस्कृत श्लोक म्हणून करणाऱ्या निकम यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकूब मेमन आणि २६/११ च्या खटल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात मोलाची भूमिका बजावली. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही या दोघांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. या दोन्ही केसमध्ये सामान्य जनतेला न्याय मिळाला. त्यांनी या केसेसमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित केला. ‘हा क्षण आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. देशातील १२५ कोटी जनतेशी मी जोडला गेलो आहे. कायद्याचा अदब न ठेवणाऱ्याला धडा शिकवण्याचा व कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचा निश्चय या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाला आहे,’ असेही अ‍ॅड. निकम म्हणाले.अ‍ॅड. निकम यांनी हा पुरस्कार त्यांच्या आई-वडिलांना समर्पित केला आहे. ‘माझे वडील साने गुरुजींच्या सान्निध्यात शिकले. त्यामुळे त्यांच्या अंगी कडक शिस्त होती, तर आई क्रांतिवीर सिंह नाना पाटील आणि नागनाथ नायकवडी यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली होती. त्यामुळे तिच्या अंगी असलेला धाडसीपणा, तर वडिलांची शिस्तप्रियता मला माझ्या वकिली व्यवसायात अत्यंत उपयोगी पडली,’ असेही अ‍ॅड. निकम नमूद करतात. या पुरस्काराबद्दल अ‍ॅड. निकम यांनी भारत सरकार आणिराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ‘याशिवाय निडरपणे न्यायालयात साक्ष देणारे आणि तपास करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची बहुमोल मदत मी विसरू शकतनाही,’ असेही अ‍ॅड. निकम यांनी म्हटले. (प्रतिनिधी) मूळचे जळगावचे असलेले उज्ज्वल निकम यांचे वडील देवरावजी निकम कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांच्याकडूनच कायद्याचे धडे घेत उज्ज्वल निकम वकील बनले. जळगावच्या एस. एस. मणियार लॉ कॉलेजमधून १९७७ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली. सुरुवातीला ते दिवाणी केसेस हाताळत होते. मात्र, त्यामध्ये त्यांना समाधान मिळाले नाही. त्यांनी जळगाव जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. च्१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात निकम यांची नियुक्ती विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आली. या घटनेनंतर निकम माध्यमांच्या आणि सामान्य नागरिकांच्या आकर्षणाचा बिंदू ठरले. त्यानंतर गुलशन कुमार हत्याप्रकरण, प्रमोद महाजन हत्या, खैरलांजी दलित हत्याकांड, पुण्याचे राठी हत्याप्रकरण, कोल्हापूरचे बाल हत्याकांड, मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशन बलात्कार प्रकरण आणि मुंबईतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी निकम यांनी सरकारची बाजू न्यायालयापुढे भक्कमपणे मांडत आरोपींना धडा शिकवला. च्१९९३ साखळी बॉम्बस्फोट, गेट वे आॅफ इंडिया बॉम्बस्फोट (टिष्ट्वन बॉम्बस्फोट), कल्याण रेल्वे बॉम्बस्फोट आणि मुंबई दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना फासावर चढवून समाजाला न्यायव्यवस्था कणखर असल्याचा संदेश दिला.