शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राज्य शिखर बँकेच्या नफ्यात घट

By admin | Updated: January 9, 2016 04:10 IST

काही वर्षांपूर्वी घोटाळ्यांनी गाजलेली राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळाने गेल्या वर्षी तब्बल ४१२ कोटी रुपयांनी नफ्यात आणली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या

यदु जोशी,  मुंबईकाही वर्षांपूर्वी घोटाळ्यांनी गाजलेली राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळाने गेल्या वर्षी तब्बल ४१२ कोटी रुपयांनी नफ्यात आणली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, यंदा या नफ्याला घसरण लागणार असे स्पष्ट दिसत आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना इतरत्र ठेवी ठेवण्यास दिलेली अनुमती व राज्य बँकेने कमी केलेला व्याज दर याचा हा परिपाक आहे, की प्रशासक मंडळाचे अपयश, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्य बँकेला २०१३मध्ये ३१५ कोटी, २०१४मध्ये ४०१ कोटी तर २०१५मध्ये ४१२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षात ३१ डिसेंबरपर्यंत हा नफा २२५ कोटी रुपयांचा झाला आहे. गेल्या वर्षीइतका नफा मिळवायचा तर येत्या मार्चपर्यंत उर्वरित तीन महिन्यांमध्ये आणखी १८७ कोटी रुपयांचा नफा राज्य बँकेला मिळवावा लागणार असून, सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता हा आकडा गाठणे अशक्य दिसते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या बँकेच्या प्रशासक मंडळात खांदेपालट करीत शासनाने डॉ. एम. एल. सुखदेवे यांची मंडळाच्या अध्यक्षपदी १५ जुलै २०१५ रोजी नियुक्ती केली होती. ए. ए. मगदुम आणि के. एन. तांबे हे मंडळाचे दोन सदस्य आहेत. आघाडी सरकारने नेमलेल्या प्रशासक मंडळाने बँकेला तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढत नफ्यात सातत्याने वाढ केली. मात्र, नव्या भाजपा सरकारने नेमलेल्या प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात नफ्यात घसरण झाल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यांत कर्जबुडव्या सहकारी साखर कारखान्यांच्या संपत्तीची विक्री करण्याचा प्रयत्न राज्य बँक करीत आहे. मात्र, साखर उद्योगातील एकूणच मंदी लक्षात घेता चारवेळा जाहिराती देऊनही कोणी खरेदीसाठी पुढे आलेले नाही. एकदा ही विक्री झाली तर नफा वाढू शकेल, असा बँकेचा होरा आहे. आधीच्या प्रशासक मंडळाने बँकेतील ठेवींवरील व्याजाचा दर ८ टक्क्यांवरून ७ टक्के केला. त्यामुळे ठेवी कमी झाल्या, असे एकीकडे म्हटले जात असले तरी व्याजापोटी बँकेला द्यावयाची रक्कम कमी झाली, असे समर्थनही दिले जात आहे.बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, बँकेची सुस्थिती ही केवळ नफ्याच्या परिमाणावर मोजली जाऊ शकत नाही. बँकेचे भांडवल पर्याप्तता निधीचे प्रमाण २०१३मध्ये १०.६४ टक्के इतके होते. गेल्या वर्षी ते १६.३० टक्क्यांवर गेले आणि यंदा ते १७ टक्क्यांहून अधिक असेल. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत नफा २२५ कोटी रुपये असला तरी शेवटच्या तीन महिन्यांत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढेल. ठेवी आताच १० हजार ४९० कोटींवर गेल्या आहेत. निव्वळ आणि ढोबळ अनुत्पादित कर्ज (एनपीए) कमी झाले. कर्जवसुली चांगली झाल्याचे हे द्योतक आहे. १० वर्षांनंतर बँकेने सभासदांना पहिल्यांदा लाभांश दिला. राज्य सरकारला १०० कोटी रुपयांच्या भागभांडवलावर बँकेने एकूण २७ कोटी रुपये दिले आहेत.