शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

निर्मितीत घट, मागणीत वाढ, राज्यात अघोषित भारनियमन

By admin | Updated: July 15, 2015 00:23 IST

१५ दिवसांत ३५00 मेगा वॉट विजेची मागणी वाढली

अकोला : पावसाळ्याच्या सुरुवातीला धो-धो बरसलेल्या पावसाने एक महिना दडी दिली. त्यामुळे कृषिपंपांचा वाढलेला वापर आणि हवामान बदलामुळे उष्णतामान वाढून, केवळ १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३000 ते ३५00 मेगा वॉटने वाढ झाली आहे. दुसरीकडे निर्मितीतही घट आली आहे. परिणामी मागणी व पुरवठय़ात तफावत निर्माण झाल्याने राज्यात अघोषित भारनियमनाला सुरुवात झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कृषिपंपांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी असलेली राज्याची १३५00 ते १४000 मे. वॉ. विजेची मागणी वाढून १६000 ते १६,५00 मे.वॉ. एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यात काही तास अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. महानिर्मितीचे परळी येथील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ५५00 मे.वॉ. अपेक्षित असली तरी, प्रत्यक्षात केवळ ३८00 मे. वॉ. पर्यंत वीज उपलब्ध होत आहे. पवन ऊज्रेतूनही १८00 ते २२00 मे. वॉ. अपेक्षित असलेली वीज केवळ १000 मे.वॉ. पर्यंत मिळत आहे. तिरोडा येथील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ (६६0 मे. वॉ.) आणि अमरावती येथील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नसल्यामुळे राज्यात प्रथमच मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता जी- १, जी- २ आणि जी-३ या गटात भारनियमन करण्यात आले. केंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही फ्रिक्वेन्सीमध्ये तफावत येत असल्याने आज इतर गटातही भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्स्चेंजमधून १ हजार ते १२00 मे. वॉ. वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. कोयना येथील २५0 मे.वॉ.चा संच सुरू झाल्यामुळे विजेची उपलब्धता वाढल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्वच गटातील भारनियमन कमी करण्यात आले.

*कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीतच

      विजेचा तुटवडा निर्माण होत असला तरी, सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन महावितरणने कृषिपंपाचे भारनियमन न करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषिपंपांना निर्धारित तासांचा वीजपुरवठा करण्यात येत आहे.