शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

निर्मितीत घट, मागणीत वाढ, राज्यात अघोषित भारनियमन

By admin | Updated: July 15, 2015 00:23 IST

१५ दिवसांत ३५00 मेगा वॉट विजेची मागणी वाढली

अकोला : पावसाळ्याच्या सुरुवातीला धो-धो बरसलेल्या पावसाने एक महिना दडी दिली. त्यामुळे कृषिपंपांचा वाढलेला वापर आणि हवामान बदलामुळे उष्णतामान वाढून, केवळ १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३000 ते ३५00 मेगा वॉटने वाढ झाली आहे. दुसरीकडे निर्मितीतही घट आली आहे. परिणामी मागणी व पुरवठय़ात तफावत निर्माण झाल्याने राज्यात अघोषित भारनियमनाला सुरुवात झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कृषिपंपांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी असलेली राज्याची १३५00 ते १४000 मे. वॉ. विजेची मागणी वाढून १६000 ते १६,५00 मे.वॉ. एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यात काही तास अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. महानिर्मितीचे परळी येथील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ५५00 मे.वॉ. अपेक्षित असली तरी, प्रत्यक्षात केवळ ३८00 मे. वॉ. पर्यंत वीज उपलब्ध होत आहे. पवन ऊज्रेतूनही १८00 ते २२00 मे. वॉ. अपेक्षित असलेली वीज केवळ १000 मे.वॉ. पर्यंत मिळत आहे. तिरोडा येथील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ (६६0 मे. वॉ.) आणि अमरावती येथील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नसल्यामुळे राज्यात प्रथमच मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता जी- १, जी- २ आणि जी-३ या गटात भारनियमन करण्यात आले. केंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही फ्रिक्वेन्सीमध्ये तफावत येत असल्याने आज इतर गटातही भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्स्चेंजमधून १ हजार ते १२00 मे. वॉ. वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. कोयना येथील २५0 मे.वॉ.चा संच सुरू झाल्यामुळे विजेची उपलब्धता वाढल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्वच गटातील भारनियमन कमी करण्यात आले.

*कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीतच

      विजेचा तुटवडा निर्माण होत असला तरी, सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन महावितरणने कृषिपंपाचे भारनियमन न करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषिपंपांना निर्धारित तासांचा वीजपुरवठा करण्यात येत आहे.