शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

तूर, चना डाळीच्या किमतीत घट

By admin | Updated: May 2, 2016 00:14 IST

तूर डाळीच्या टंचाईनंतर वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या छापासत्रामुळे तूर आणि चना डाळींच्या किमतीत आठ दिवसात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट झाली

नागपूर : तूर डाळीच्या टंचाईनंतर वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या छापासत्रामुळे तूर आणि चना डाळींच्या किमतीत आठ दिवसात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट झाली आहे. घाऊक बाजारात तूर डाळ १२० ते १३५ आणि चना डाळ ६८ ते ७० रुपये किलोपर्यंत खाली आली आहे.छापासत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये साठा करण्याची मानसिकता नाही. गेल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात एका व्यापाऱ्याकडून धान्य वितरण विभागाने ४६१ क्विंटल तूर डाळ जप्त केली होती.गेल्या दोन वर्षांत तुरीचे उत्पादन फारच कमी झाहे. डाळमील चालकांना ८५०० ते ९००० रुपये क्ंिवटल या दराने तूर खरेदी करावी लागत आहे. सर्व प्रक्रियेनंतर डाळ तयार झाल्यास बाजारात खरेदीसाठी ग्राहक नाहीत. शिवाय डाळ महाग असल्यामुळे कुणीही व्यापारी साठवणूक करीत नाहीत. दुसरीकडे गरीब आणि सामान्य ग्राहकांनी तूर डाळीला पर्याय म्हणून वाटाणा डाळीचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी तूर डाळ खरेदीवर अघोषित बंदी टाकल्याचे बाजारात दिसत आहे. शासनाने तपासणी व चौकशी करावी, पण साठवणुकीची मर्यादा घालून द्यावी, असे मत धान्य बाजाराचे अभ्यासक रमेश उमाठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तूर डाळीच्या किमतीत लाखोळी डाळ स्वस्त आहे. शिवाय प्रथिने जास्त प्रमाणात असल्यामुळे तिची विक्री वाढली आहे. तांदळाच्या किमतीत चढउतारउपलब्धतेनंतरही बाजारात मागणीअभावी तांदळाच्या किमतीत घट झाली आहे. लग्नसराईची खरेदी संपली आहे. ठोक बाजारात श्रीराम तांदळाच्या किमतीत क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची घट होऊन किंमत ४६०० ते ४६५० रुपयांवर स्थिरावली आहे. चिन्नोर तांदळात २०० रुपयांची वाढ झाली. भाव ४७०० ते ५००० रुपयांवर गेले. याउलट एचएमटी ३२०० ते ३४००, बीपीटी २८५० ते ३१००, सुवर्णा तांदूळ २२०० ते २४०० रुपयांवर स्थिर आहे. (प्रतिनिधी)गहू वधारला : मध्यतंरी पावसामुळे काही प्रमाणात गहू खराब झाला. त्यामुळे उत्तम दर्जाच्या गव्हाला मागणी वाढली. परिणामी ठोक बाजारात क्विंटलमागे दरात ५० ते १०० रुपयांची वाढ झाली. एमपी बोट सरबती २४०० ते ३५५० रुपये, लोकवन मध्यम १९०० ते २२५० रुपये, लोकवन उत्तम २२५० ते २४००, तुकडी २२०० ते २४५० रुपये भाव आहेत. ट्रकच्या वाढीव भाड्याचा गव्हाची किंमत वाढण्यास हातभार लागल्याची माहिती उमाठे यांनी दिली.