शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल तर किमान गप्प तरी बसा; अमित शहांचा काँग्रेसवर हल्ला

By appasaheb.patil | Updated: September 1, 2019 21:19 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा सोलापुरात समारोप

ठळक मुद्दे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप- अमित शहा यांनी राहुल गांधीसह शरद पवार याच्यावर केला हल्लाबोल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले जनतेचे आभार

सोलापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध आहे की पाठिंबा आहे, याचा खुलासा करावा, असं आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्याचा समारोप कार्यक्रम सोलापुरात आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी अमित शहा बोलत होेते़ यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री अमित शहा, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, संभाजी पाटील-निलंगेकर, विनोद तावडे, अशिष शेलार यांच्यासह आदी केंद्र व राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, भाजप विरोधात असताना जेव्हा जेव्हा देशाचा विषय आला त्या त्या वेळी भाजपाने काँग्रेस सरकारला समर्थन देण्याचे काम केले़ आता देशात भाजपाची सत्ता आहे़ भाजपाचे मागील पाच वर्षात देशात विकासाची गंगा आणली़ जातीपातीचे राजकारण न करता विकासाभिुमख काम केले़ जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि हिताचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा तेव्हा काँग्रेस वेगळी भूमिका घेते. चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल तर किमान गप्प तरी बसा, असा हल्लाही शहा यांनी केला. 

सोलापूर येथे महाजनादेश यात्रेला संबोधित करताना अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवत केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची जंत्रीच सादर केली. ३७० कलम हटविल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात निवडणुका होत असल्याने राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचं आवाहनही शहा यांनी केलं. 

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण