शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

राखीव वर्गातील उमेदवारास खुले पद नाकारणे घटनाबाह्य

By admin | Updated: April 2, 2015 02:57 IST

राखीव प्रवर्गातील उमेदवाराने आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या प्रवर्गातील जागेसाठी इतरांशी स्पर्धा करून गुणवत्ता दाखविली असेल तर अशा

मुंबई : राखीव प्रवर्गातील उमेदवाराने आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या प्रवर्गातील जागेसाठी इतरांशी स्पर्धा करून गुणवत्ता दाखविली असेल तर अशा उमेदवाराने जात पडताळणी दाखला देण्याचा आग्रह धरणे व तो दिला नाही म्हणून त्याला ते पद नाकारणे घटनाबाह्य आहे, असा निकाल देत उच्च न्यायालयाने एस.टी. महामंडळातील एका वाहकास वाहतूक नियंत्रक होण्याची संधी दिली आहे.हा निकाल देताना न्या. एस. एस. शिंदे व न्या. आर. आर. बोरा यांच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने म्हटले की, राज्यघटनेनुसार सरकारी नोकऱ्या व बढत्यांमध्ये राखीव प्रवर्गांसाठी आरक्षणाची तरतूद असली तरी ‘सर्वसाधारण प्रवर्ग’ (ओपन कॅटेगरी) असा वेगळा वर्ग नाही. ज्यास ‘सर्वसाधारण प्रवर्ग’ म्हटले जाते त्यात राखीव प्रवर्गातील व्यक्तींसह सर्वांचा समावेश होतो. नोकरी किंवा बढतीच्या खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या जागेसाठी तेही, आरक्षित वर्गाचा दावा न करता, इतरांसोबत स्पर्धा करू शकतात. त्यामुळे अशी व्यक्ती आपले मागासलेपण बाजूला ठेवून खुल्या स्पर्धेत उतरून गुणवत्तेवर उतरते तेव्हा तिला पुन्हा मागास प्रवर्गाची मानून त्याप्रमाणे वागणूक देणे सर्वस्वी चुकीचे ठरते. नंदनवन कॉलनी, हिंवरखेड रोड, कन्नड येथे राहणारे एस.टी. महामंडळातील एक वाहक सुरेश पहाडसिंग हकुमवार यांनी केलेली याचिका मंजूर करून महामंडळाने त्यांचा वाहतूक नियंत्रक या पदावरील बढतीसाठी विचार करावा, असा आदेश न्यायालयाने दिला. हकुमवार राजपूत भामटा या अनुसूचित जमातीचे आहेत. परंतु या जातीचा फायदा न घेता ते १९८१ मध्ये एस.टी. महामंडळात वाहक म्हणून नोकरीस लागले व तेव्हापासून त्यांनी नोकरीसाठी कधी राखीव प्रवर्गाचा दावा केला नाही. नाही म्हणायला त्यांच्या सेवा पुस्तकात त्यांच्या जातीची नोंद आहे. महामंडळाने जून २०११ मध्ये वाहतूक नियंत्रक ही खुल्या प्रवर्गातील पदे भरण्यासाठी अंतर्गत जाहिरात दिली. हकुमवार यांनी महामंडळाची परवानगी घेऊन खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून यासाठी परीक्षा दिली. निवड यादीत ते गुणवत्तेनुसार ५७ व्या क्रमांकावर आले. महामंडळाने त्यांच्याकडे जात पडताळणी दाखल्याची मागणी केली. तो दिला नाही असे कारण देऊन विभागीय नियंत्रक संजय वामनराव कुपेकर यांनी तुमचा बढतीसाठी विचार केला जाऊ शकत नाही, असे हकुमवार यांना २०१३ मध्ये कळविले.त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी एस.टी. महामंडळाने घेतलेली भूमिका केवळ अतार्किक व अवाजवीच नव्हे तर राज्यघटनेलाही धरून नाही, असा शेरा न्यायालयाने मारला. (विशेष प्रतिनिधी)