शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शाळांबाबत १५ दिवसांत निर्णय- आरोग्य मंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 09:21 IST

टास्क फोर्स राज्याचा आढावा घेणार

जालना : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना शिक्षक संघटना आणि विशेष करून इंग्रजी शाळाचालकांकडून शाळा बंदच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली जात आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आगामी पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातील रुग्णवाढीचा वेग आणि तेथील उपाययोजनांचा आढावा घेऊन नंतर या शाळा सुरू करण्यासाठी विचार होऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली.  टोपे म्हणाले की, शाळांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचे गुणोत्तर हे तुलनेने आज तरी जास्त दिसत आहे; परंतु यामुळे रुग्ण गंभीर होत नसल्याने ही एक समाधानकारक बाब म्हणावी लागेल. शाळा नव्याने सुरू करण्यासाठी आताच घाई करून चालणार नाही. बंद करण्याचा निर्णयदेखील सर्वांनी मिळून घेतला होता. त्यामुळे नव्याने सुरू करण्यावरही टास्क फोर्स तसेच अन्य वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे.  ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे, त्या गावांमध्येही केवळ ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत त्या सुरू करता येतील, अशी शक्यता टोपे यांनी अत्यंत सावध व्यक्त केली.  

त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्याची गरज   रविवारी लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता लसीकरणाबाबत जागृती वाढली असून, एक आणि दोन डोस घेतलेल्यांची संख्या आता लक्षणीय आहे. ती आणखी वाढविण्यासाठी आपण केंद्राकडे जादा डोसची मागणी केली असल्याचे टोपे म्हणाले. एकूणच ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही. कोरोनाची त्रिसूत्री आणखी प्रभावी राबविण्याची गरज असून, गर्दी टाळण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे