शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

२.२४ लाख शेतकऱ्यांना कृषिपंप, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:40 IST

पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या सुमारे २ लाख २४ हजार कृषिपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे २ कृषिपंपांना एका रोहित्राद्वारे वीजपुरवठा करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई : पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या सुमारे २ लाख २४ हजार कृषिपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे २ कृषिपंपांना एका रोहित्राद्वारे वीजपुरवठा करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.या योजनेंतर्गत नवीन वीज उपकेंद्र उभारण्यास ५ हजार ४८ कोटी खर्च करण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र परिषदेत सांगितले. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महावितरण मुख्यालयात एक स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

खासगी शाळांना ६५ कोटीअनुदानास पात्र घोषित केलेल्या विनाअनुदान व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्क्यांंप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता. त्याची आता अंमलबजावणी करीत एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या १२ महिन्यांसाठी ६५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.भविष्यात कधीही शासनाकडे अनुदानाची मागणी करणार नाहीत, अशा आशयाचे हमीपत्र लिहून घेऊन कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन शाळांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नोव्हेंबर २००१ मध्ये घेतला होता. अशा शाळांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, जुलै २००९ मध्ये ‘कायम विनाअनुदानित’ यातील कायम हा शब्द वगळण्यात आला. १५ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार अशा अनुदानासाठी शाळांच्या मूल्यांकनाचे निकष तयार करण्यात आले. या शाळांना अनुदान देण्याची मागणी विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या ३० आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनात पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार शासनाच्या पुढील आदेशापर्यंत सरसकट २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र