शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

२.२४ लाख शेतकऱ्यांना कृषिपंप, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:40 IST

पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या सुमारे २ लाख २४ हजार कृषिपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे २ कृषिपंपांना एका रोहित्राद्वारे वीजपुरवठा करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई : पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या सुमारे २ लाख २४ हजार कृषिपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे २ कृषिपंपांना एका रोहित्राद्वारे वीजपुरवठा करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.या योजनेंतर्गत नवीन वीज उपकेंद्र उभारण्यास ५ हजार ४८ कोटी खर्च करण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र परिषदेत सांगितले. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महावितरण मुख्यालयात एक स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

खासगी शाळांना ६५ कोटीअनुदानास पात्र घोषित केलेल्या विनाअनुदान व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्क्यांंप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता. त्याची आता अंमलबजावणी करीत एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या १२ महिन्यांसाठी ६५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.भविष्यात कधीही शासनाकडे अनुदानाची मागणी करणार नाहीत, अशा आशयाचे हमीपत्र लिहून घेऊन कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन शाळांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नोव्हेंबर २००१ मध्ये घेतला होता. अशा शाळांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, जुलै २००९ मध्ये ‘कायम विनाअनुदानित’ यातील कायम हा शब्द वगळण्यात आला. १५ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार अशा अनुदानासाठी शाळांच्या मूल्यांकनाचे निकष तयार करण्यात आले. या शाळांना अनुदान देण्याची मागणी विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या ३० आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनात पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार शासनाच्या पुढील आदेशापर्यंत सरसकट २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र