शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या निर्णयावर ठरणार आमदारपुत्र राहुल देसाईंच भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 16:48 IST

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका तोंडावर असून, राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेला राधानगरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिले होते. मात्र या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसनेचे असल्याने त्यांनी राधानगरी मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे राहुल यांना उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे युतीच्या निर्णयावर आमदारपुत्र राहुल यांचे भवितव्य ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी राहूल यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र हा मतदारसंघ युतीच्या फॉम्युर्लानुसार शिवसेनेकडे आहे. त्यातच विद्यमान आमदार सुद्धा शिवसेनेचे असल्याने हा मतदारसंघ सेना सोडायला तयार नाही.

भाजप-शिवसेनेत युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर दुसरीकडे भाजप- सेना नेत्यांचे येत असलेल्या वक्तव्य पाहिले तर, ऐनवेळी युती तुटण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे युतीचा काय निर्णय होणार यावर राहुल देसाई यांचे भवितव्य ठरणार आहे. जर युती झाली नाही, तरच राहुल यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. मात्र असे असले तरीही, माजी आमदार बजरंग देसाई हे आपल्या चिरंजीव साठी ऐनवेळी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

बजरंग देसाई यांचा मतदारसंघात चांगले वजन आहे. १९८५ आणि १९९९ मध्ये ते राधानगरी मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे चंद्रकात पाटील यांनी त्यांचा मुलाला भाजपची उमेदवारीचे आश्वासन देऊन आपल्या पक्षात घेतले. त्यात हा मतदारसंघ आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीकडे गेला असल्याने तिथे उमेदवारी मिळण्याचे निश्चित नसल्याने बजरंग देसाई यांनी भाजपात जाने पसंद केले. मात्र आता त्यांना दिलेले आश्वासन चंद्रकात पाटील कसे पाळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.