शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

युतीच्या निर्णयावर ठरणार आमदारपुत्र राहुल देसाईंच भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 16:48 IST

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका तोंडावर असून, राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेला राधानगरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिले होते. मात्र या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसनेचे असल्याने त्यांनी राधानगरी मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे राहुल यांना उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे युतीच्या निर्णयावर आमदारपुत्र राहुल यांचे भवितव्य ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी राहूल यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र हा मतदारसंघ युतीच्या फॉम्युर्लानुसार शिवसेनेकडे आहे. त्यातच विद्यमान आमदार सुद्धा शिवसेनेचे असल्याने हा मतदारसंघ सेना सोडायला तयार नाही.

भाजप-शिवसेनेत युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर दुसरीकडे भाजप- सेना नेत्यांचे येत असलेल्या वक्तव्य पाहिले तर, ऐनवेळी युती तुटण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे युतीचा काय निर्णय होणार यावर राहुल देसाई यांचे भवितव्य ठरणार आहे. जर युती झाली नाही, तरच राहुल यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. मात्र असे असले तरीही, माजी आमदार बजरंग देसाई हे आपल्या चिरंजीव साठी ऐनवेळी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

बजरंग देसाई यांचा मतदारसंघात चांगले वजन आहे. १९८५ आणि १९९९ मध्ये ते राधानगरी मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे चंद्रकात पाटील यांनी त्यांचा मुलाला भाजपची उमेदवारीचे आश्वासन देऊन आपल्या पक्षात घेतले. त्यात हा मतदारसंघ आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीकडे गेला असल्याने तिथे उमेदवारी मिळण्याचे निश्चित नसल्याने बजरंग देसाई यांनी भाजपात जाने पसंद केले. मात्र आता त्यांना दिलेले आश्वासन चंद्रकात पाटील कसे पाळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.