शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घ्या, अन्यथा मुंबईतील मोर्चात उद्रेक

By admin | Updated: September 26, 2016 21:36 IST

मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघत आहेत

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 26 - मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघत आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे. राज्यभरातील मागण्या सारख्याच आहेत. असे असताना शासन मोर्चेकऱ्यांशी चर्चा करू, असे म्हणत आहे. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी मागण्या पूर्ण करा, अन्यथा मुंबईत होणाऱ्या मोर्चात समाजबांधवांचा उद्रेक होईल, असा इशारा दहा ते बारा मराठा संघटनांनी सोमवारी औरंगाबादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ ९ आॅगस्ट रोजी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा झाला. अहिंसा, शिस्त आणि स्वच्छतेचा संदेश या मोर्चातून संपूर्ण राज्याला दिला. मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करणाऱ्या मराठा संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांची सोमवारी येथे बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र काळे आणि राजेंद्र जंजाळ म्हणाले की, संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. हे सर्व मोर्चे शांततेच्या मार्गाने होत आहेत. मात्र, कोपर्डीची घटना, मराठा आरक्षणाचा प्रश्न, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर याबाबत मराठा समाजात तीव्र संताप आहे. कोणत्याही घटनेत ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांनी अद्यापही पीडितेच्या आई-वडिलांचा जबाब नोंदविला नाही. आम्ही अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात काळानुसार बदल करण्याची मागणी करीत आहोत. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची आमची मागणी नाही. असे असताना काही लोक याबाबत अफवा पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. मात्र, आजपर्यंत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर एकदाही चर्चा केलेली नाही. तसेच शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्या आहेत.चर्चा कशाला? निर्णय घ्या...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा मोर्चांच्या नेत्यांशी चर्चा करणार, असे वारंवार सांगत आहेत. आमच्या या मोर्चाला नेता नाहीच. मराठा मोर्चाचे नेतृत्व हे संपूर्ण समाज करीत आहे. मग तुम्ही चर्चा कोणासोबत करणार, असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या निवेदनातील मागण्यांसंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनांनी केले.या पत्रकार परिषदेला किशोर चव्हाण, अप्पासाहेब कुढेकर, अभिजित देशमुख, विनोद पाटील, राहुल बनसोड, किशोर थोरात, रवी सोडतकर, प्रा.प्रदीप सोळुंके, संजय सावंत, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश केरे, नगरसेवक विजय औताडे, राज वानखेडे, सखाराम काळे आदींची उपस्थिती होती.मराठा क्रांती मोर्चासंदर्भात ३० रोजी मुंबईत बैठकराज्यभरातील मोर्चानंतर मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी करण्यासाठी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चा समन्वय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर येथील शिवाजी नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.