शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कर्जमाफीत सावळागोंधळ; एकच आधार आणि बँक अकाऊंट नंबर असलेले लाखो लाभार्थी शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 11:07 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे.  राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मुंबई- शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले शेकडो लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे.  राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दिवाळीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील गोंधळाची परिस्थिती आता समोर येत आहे. एकच आधार कार्ड क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर असलेले लाखो लाभार्थी या यादीत आहे. उदाहरणासाठी, दिलीप काचळे या शेतकऱ्याचा आधार क्रमांक 111111110157 आणि बँक अकाऊंट नंबर 111111111111 आहे. तर बाळकृष्ण रामघंगाळी यांचाही आधार कार्ड क्रमांक  111111110157 आणि बँक अकाऊंट नंबर 111111111111  आहे. अशा शेकडो लाभार्थ्यांचे आधार आणि बँक अकाऊंट नंबर एकच असून यामुळे राज्य सरकारसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. आम्हाला एकच आधार आणि बँक अकाऊंट नंबर असलेले लाभार्थी बघून आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटनंबर एकच असणं, हे आम्हाला विचारात टाकण्यासारखं आहे, असं . माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही के गौतम यांनी म्हंटलं आहे.

याशिवाय एकाच शेतकऱ्याच्या नावाने सहा कर्ज खाती आणि एका शेतकऱ्याचं नाव एकाच यादीत तीन वेळा असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील गोंधळाची परिस्थिती याआधीही समोर आली आहे.  उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील शेतकरी भारत तांबे यांनी 1 लाख 40 हजार रुपयांच्या कर्जमाफीसाठी अर्ज केलेला असताना त्याला फक्त 10 हजार रुपयाच्या कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. दुसरीकडे राज्य सरकारने 89 लाख शेतकऱ्यांचे 34 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात कर्जमाफीचा आकडा 20 हजार कोटी रुपयांच्या जवळपासच राहील, असा अंदाज आहे.