शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची आकडेमोड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 01:00 IST

कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातून माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि पीककर्जासह एकूण

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातून माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि पीककर्जासह एकूण कर्जाची रक्कम एकत्रित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कर्जमाफीचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ होईल, असे सध्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे ‘तत्वत:’ मान्यता दिली आहे़ त्यामुळे या शासनाला मी ‘तत्वत:’ धन्यवाद देतो़ शासनाचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी जी पावले उचलायला पाहिजे, ती उचलली नसल्याचे कृषीतज्ञ आणि शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे सदस्य डॉ़ बुधाजीराव मुळीक यांनी पुण्यात सांगितले़ कर्जमाफीची घोषणा केली असली तरी शासनाने केवळ पीककर्ज की मुदत कर्ज माफ केले हे स्पष्ट केलेले नाही़ अनेकांनी ग्रीन हाऊस, यमू पालन, लिफ्टसाठी मुदत कर्ज घेतले आहे़ त्यांना माफी मिळणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही़ याशिवाय डेअरी, पोल्ट्री, मासेपालन, रेशीम उद्योग यांनाही त्याचा लाभ मिळणार का हेही स्पष्ट झाले नाही, असेही डॉ मुळीक यांनी सांगितले. कोल्हापूरात २५० कोटींची कर्जमाफी शक्यकोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार असून २५२ कोटींची थकबाकी माफ होणार आहे. सांगली जिल्ह्याची थकबाकी १८०० कोटीचीसांगली जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकेकडून मार्च २०१७ पर्यंत ९४७ कोटीचे पीककर्ज थकीत आहे, सातारा जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे पीककर्ज थकीतमार्च २0१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत २ हजार ६८४ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे. यापैकी १५४ कोटी ३१ लाखांचे कर्ज थकीत आहे. खान्देशात १,३४३ कोटींची कर्जमाफीखान्देशात दोन लाख ९१ हजार शेतकऱ्यांचे १,३४३ कोटी रुपयांचे कर्जमाफ होऊ शकते. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ लाख ६० हजार ९८३ अल्पभूधारक खातेदारांना नव्या निर्णयाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.नगर जिल्ह्याला ९५९ कोटींची कर्जमाफी शक्यअहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना ९५९ कोटी रुपयांच्या पीक कर्ज माफीचा फायदा मिळू शकेल.सिंधुदुर्गात ८ टक्के थकबाकीदारसिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०१६ मध्ये सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत २०७ कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. या कर्ज वाटपात जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा होता. त्या वेळेस सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत ११० कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले होते. यातील तब्बल ९२ टक्के शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे. रत्नागिरीत ८५ टक्के कर्जआंबा बागायतीसाठी रत्नागिरीत तब्बल ५००कोटींची आवश्यकता भासणार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक आॅफ इंडिया यांच्याकडून एक लाख १९ हजार लाभार्थ्यांनी कर्ज घेतले आहे. यातील ८५ टक्के कर्ज आंबा बागायतीसाठी घेतलेले असून, बहुतांश कर्जदार अल्पभूधारकच आहेत.