शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
3
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
4
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
5
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
6
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
7
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
8
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
9
एमएमसी झोनच्या ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ८९ लाखांचं होतं बक्षीस; दरेकसा दलम झाला खिळखिळा
10
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
13
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
14
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
15
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
16
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
17
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
18
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
19
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
20
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची आकडेमोड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 01:00 IST

कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातून माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि पीककर्जासह एकूण

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातून माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि पीककर्जासह एकूण कर्जाची रक्कम एकत्रित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कर्जमाफीचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ होईल, असे सध्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे ‘तत्वत:’ मान्यता दिली आहे़ त्यामुळे या शासनाला मी ‘तत्वत:’ धन्यवाद देतो़ शासनाचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी जी पावले उचलायला पाहिजे, ती उचलली नसल्याचे कृषीतज्ञ आणि शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे सदस्य डॉ़ बुधाजीराव मुळीक यांनी पुण्यात सांगितले़ कर्जमाफीची घोषणा केली असली तरी शासनाने केवळ पीककर्ज की मुदत कर्ज माफ केले हे स्पष्ट केलेले नाही़ अनेकांनी ग्रीन हाऊस, यमू पालन, लिफ्टसाठी मुदत कर्ज घेतले आहे़ त्यांना माफी मिळणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही़ याशिवाय डेअरी, पोल्ट्री, मासेपालन, रेशीम उद्योग यांनाही त्याचा लाभ मिळणार का हेही स्पष्ट झाले नाही, असेही डॉ मुळीक यांनी सांगितले. कोल्हापूरात २५० कोटींची कर्जमाफी शक्यकोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार असून २५२ कोटींची थकबाकी माफ होणार आहे. सांगली जिल्ह्याची थकबाकी १८०० कोटीचीसांगली जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकेकडून मार्च २०१७ पर्यंत ९४७ कोटीचे पीककर्ज थकीत आहे, सातारा जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे पीककर्ज थकीतमार्च २0१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत २ हजार ६८४ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे. यापैकी १५४ कोटी ३१ लाखांचे कर्ज थकीत आहे. खान्देशात १,३४३ कोटींची कर्जमाफीखान्देशात दोन लाख ९१ हजार शेतकऱ्यांचे १,३४३ कोटी रुपयांचे कर्जमाफ होऊ शकते. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ लाख ६० हजार ९८३ अल्पभूधारक खातेदारांना नव्या निर्णयाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.नगर जिल्ह्याला ९५९ कोटींची कर्जमाफी शक्यअहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना ९५९ कोटी रुपयांच्या पीक कर्ज माफीचा फायदा मिळू शकेल.सिंधुदुर्गात ८ टक्के थकबाकीदारसिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०१६ मध्ये सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत २०७ कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. या कर्ज वाटपात जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा होता. त्या वेळेस सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत ११० कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले होते. यातील तब्बल ९२ टक्के शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे. रत्नागिरीत ८५ टक्के कर्जआंबा बागायतीसाठी रत्नागिरीत तब्बल ५००कोटींची आवश्यकता भासणार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक आॅफ इंडिया यांच्याकडून एक लाख १९ हजार लाभार्थ्यांनी कर्ज घेतले आहे. यातील ८५ टक्के कर्ज आंबा बागायतीसाठी घेतलेले असून, बहुतांश कर्जदार अल्पभूधारकच आहेत.