शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

लातूरमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 15, 2017 17:02 IST

औसा तालुक्यातील किल्लारी येथे बुधवारी पहाटे दिगंबर माधवराव टाचले (वय 46) शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली

ऑनलाइन लोकमत

किल्लारी (जि. लातूर), दि.15 - औसा तालुक्यातील किल्लारी येथे बुधवारी पहाटे डिंगबर माधवराव टाचले (वय 46)  शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. किल्लारी येथील राहत्या घरी सर्वजण जागे असतानाच स्वतःच्या खोलीत जाऊन रोगर नावाचे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर पत्नी ,आईला वेगळा वास येत असल्याने दार उघडले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे दाखल करण्यात आले.
तेथे डॉ. लांडे यांनी प्राथमिक उपचार करुन त्यांना शासकिय रुग्णालय लातूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले. मात्र, तेथे नेल्या नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  दिगंबर टाचले यांच्या नावावर तीन एकर जमीन आहे व वडील माधवराव  यांच्या नावावर 3.20  साडेतीन एक्कर कोरडवाहू शेती आहे.
टाचले यांच्या नावावर सोसायटीचे अकरा हजाराचे कर्ज आहे तर मुलीच्या लग्नासाठी वडील माधवराव टाचले यांच्या नावावर शुभमंगल या योजनेचे सत्तर हाजार कर्ज घेतल्याचे समजते. मुलीचे लग्न केले असून मुलगा अविवाहित आहे. याबाबत तलाठी व्यंकट पवार यांनी तहसीलदार औसा यांना शेतकरी आत्महत्या असल्याचा अहवाल सादर केला आहे,  अशी माहीती तलाठी व्यंकट पवार यांनी दिली .दिगंबर टाचले यांच्या पश्चात आई,वडील भाऊ,बहीण,पत्नी ,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.