शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री-मंत्र्यांमध्ये अधिका-यांवरून वाद

By admin | Updated: February 23, 2015 05:19 IST

मंत्र्यांनी आपल्या आस्थापनेवर मर्जीतील अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री व काही मंत्र्यांमध्ये सुरू झालेली लढाई आता तीव्र झाली असून

संदीप प्रधान, मुंबईमंत्र्यांनी आपल्या आस्थापनेवर मर्जीतील अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री व काही मंत्र्यांमध्ये सुरू झालेली लढाई आता तीव्र झाली असून, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची तसेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी मंत्र्यांच्या इशाऱ्यावर त्यांच्या लाडक्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.मागील सरकारमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी अथवा स्वीय सहायक नियुक्त करण्यास बंदी करणारा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाने १ डिसेंबर २०१४ रोजी काढल्याने वादाची ठिणगी पडली. एकनाथ खडसे, गिरीश बापट, चंद्रकांत पाटील अशा ज्येष्ठ मंत्र्यांकडे आजही मागील सरकारमध्ये काम केलेले काही मर्जीतील अधिकारी कार्यरत आहेत; तर प्रकाश मेहता, गिरीश महाजन, दिवाकर रावते, प्रवीण पोटे अशा मंत्र्यांनी जड अंत:करणाने मर्जीतील अधिकारी माघारी धाडले आहेत. अशा वातावरणात मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभागाने ३१ जानेवारी २०१५ रोजी आणखी एक आदेश काढून मंत्र्यांनी उसनवारी तत्त्वावर घेतलेल्या अधिकाऱ्यांची माहिती द्यावी, असा फतवा काढला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून पळवाट काढताना काही मंत्र्यांनी त्यांच्या खात्याशी संबंधित महामंडळात आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना नियुक्त केल्याचे दाखवले व उसनवारी आपल्या कार्यालयात कामावर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून निघालेल्या या आदेशामुळे आता मंत्र्यांच्या आस्थापनांवरील त्यांचे लाडके अधिकारी एकवटले असून त्यांनी एक पत्र तयार करून सर्व मंत्र्यांना धाडले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वी मंत्री आस्थापनावर काम केलेले कैलास शिंदे हे कार्यरत असताना केवळ मंत्र्यांवरच नियमाचा बडगा का, असा सवाल पत्रात केला आहे. राज्यातील सरकारला १०० दिवस पूर्ण होऊनही मंत्र्यांच्या कार्यालयात सावळा गोंधळ असण्याचे कारण सावधी पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेली नाहीत हेच कारण आहे. मुख्यमंत्री त्यांच्या स्वेच्छाधिकारात आपल्या कार्यालयात ५ ते ७ नियुक्त्या करीत असताना अन्य मंत्र्यांना त्यांच्या स्वेच्छाधिकारापासून रोखणे ही मुख्य सचिवांची मनमानी आहे. या विशेषाधिकार भंगाला पायबंद घालण्याकरिता विशेषाधिकार भंगाचे अस्त्र वापरण्यात येईल त्याचबरोबर जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे.