शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

विष प्राशन केलेल्या दोन चिमुकलींसह मातेचाही मृत्यू

By admin | Updated: October 2, 2016 18:09 IST

एकापाठोपाठ दोन मुली झाल्यानंतर तुला मुलगा होत नाही,असे म्हणत सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरवात केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहितेने शनिवारी सकाळी

 ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद. दि. 2- आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. असे असले तरी आजही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा अट्टाहास केला जातो.अशाच एका घटनेत एका विवाहितेला एकापाठोपाठ दोन मुली झाल्यानंतर तुला मुलगा होत नाही,असे म्हणत सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरवात केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहितेने शनिवारी सकाळी ४ आणि  २ वर्ष वयाच्या चिमुकलींना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केले. या मायलेकींचा उपचार सुरू असताना रविवारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील महालपिंप्री येथे घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निता सतिश भोळे (२२) , दिव्या सतीश भोळे(४) आणि दिप्ती सतीश भोळे(२)अशी मायलेकींची नावे आहेत. पती सतीश गोविंद भोळे, सासू सुलाबाई, भाया संतोष आणि जाऊ आम्रपाली अशी आरोपींची नावे आहेत.  पोलिसांनी सतीश आणि  संतोष यांना अटक केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिस आणि निताच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुकुंदवाडीतील  प्र्रकाशनगर येथे माहेर असलेल्या नीताचा विवाह २१ फेब्रुवारी २०११ रोजी महालपिंप्री येथील सतीशसोबत  झाला.   नीताला एकापाठोपाठ दिव्या आणि दिप्ती या दोन मुली झाल्या आहेत. लग्नानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर आरोपींकडून  घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरू झाला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या मुलीनंतर दोन वर्षापूर्वी तिला दुसरीही मुलगी झाल्याने आरोपींकडून तिच्या छळ अधिक वाढला. तुला मुलगा होत नाही, आम्हाला वंशाला दिवा पाहिजे, असे म्हणून आरोपींनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले.  विशेष म्हणजे पती, सासू आणि भाया व जाऊ हे सुद्धा तिला टोमणे मारत असत. पतीसह चार जणांविरोधात गुन्हादरम्यान याप्रकरणी नीताचे वडिल गोपीनाथ मगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलीस ठाण्यात नीताच्या पतीसह, भाया, सासू आणि जाऊ यांच्याविरोधात नीताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सतिश आणि संतोष भोळे यांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास फौजदार ए.पी.लोखंडे करीत आहे.अखेर तिने मृत्यूला कवटाळलेत्रास अस' होत असल्याने नीताने  स्वत:चे जीवन संपविण्याचे ठरवले. मात्र आपल्या पश्चात आपल्या दोन्ही चिमुकलींचे काय होईल,ही चिंता तिला सतावत होती. शेवटी तिने शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन्ही चिमुकलींना विष पाजले आणि स्वत:ही विषाची बाटली तोंडाला लावली. दोन्ही चिमुकलींना विष पाजून नीताने विष प्राशन केल्याचे समजताच भाया आणि पतीने त्यांना घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तिनही मायलेकींचा मृत्यू झाला.