शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कीटकनाशकांमुळे मृत्यू :विषबाधाप्रकरणी एसआयटी स्थापन, वभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 03:43 IST

यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या

मुंबई : यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. कृषी विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अमरावतीचे विशेष पोलीस महासंचालक, आरोग्य सहसंचालक, विभागीय कृषी संचालक सदस्य असतील. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक आणि फरिदाबाद येथील प्लान्ट प्रोटेक्शनचे प्रतिनिधी अशा सात जणांचा समावेश असणार आहे. याशिवाय तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित सदस्य म्हणून बोलाविण्याचा अधिकार एसआयटीच्या अध्यक्षांना देण्यात आला आहे.शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत जबाबदार घटक नक्की करणे, अशा प्रकारच्या आपत्तींवर प्रतिबंधासाठी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करताना घडलेल्या चुका, त्याकरिता जबाबदार व्यक्ती, संस्था निश्चित करणे, चिनी स्प्रेवरील बंदीबाबत शिफारस करणे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीला तीन आठवड्यांत आपला अहवाल सादर करायचा आहे.यवतमाळ प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, पोलीस, वन अधिकारी, पशुशल्य चिकित्सक तसेच खासगी दवाखाने, गट विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी आदींनी वेळीच अहवाल सादर केला नसल्याचा ठपका, कृषी विभागाच्या गुरुवारी जारी जीआरमध्ये ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार