शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

घातक टीन एजर

By admin | Updated: May 30, 2016 01:16 IST

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम जसा कुटुंबपद्धतीवर होत आहे तसाच तो लहान मुलांच्या जडणघडणीवरही होऊ लागला आहे.

पुणे : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम जसा कुटुंबपद्धतीवर होत आहे तसाच तो लहान मुलांच्या जडणघडणीवरही होऊ लागला आहे. ज्या वयात मुलांच्या हातामध्ये पुस्तके पडायला हवीत, सुसंस्कार व्हायला हवेत त्या वयात ही कोवळी पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत. खून, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे अल्पवयात दाखल झालेल्या उद्याच्या पिढीचे भवितव्य चिंताजनक बनू पाहत आहे. गुन्हेगारी आणि पैशांचे आकर्षण ही या लहान मुलांपुढील आव्हाने आहेत. पालकांपुढे बालगुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांकडील आकडेवारीनुसार साधारणपणे १४ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विशेषत: १६ ते १८ वयोगटातील मुलांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमधला सहभाग चिंताजनक आहे. पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपली मुले काय करतात, कुठे जातात, याचा पत्ताच पालकांना नसतो. मुलांच्या शाळांच्या दप्तरांमध्ये चाकू आणि कोयत्यासारखी हत्यारे असतात, याचीही माहिती त्यांना नसते. आजूबाजूला वाढत चाललेली गुन्हेगारी, गुन्हेगारांचे वलय हे मोठे आकर्षण या वयोगटातील मुलांना आहे. गणेशोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव स्पिकरच्या भिंती उभारून त्यासमोर बीभत्स नाच करणाऱ्यांमध्येही याच वयातील मुलांचा सर्वाधिक सहभाग असतो. पैसा आणि दहशतीचे आकर्षणही या मुलांसमोरची आव्हाने आहेत. कमी वयात मिळणारा पैसा आणि त्यातून करता येणारी मौजमजा त्यांच्यामधील गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी घालत आहे. अल्पवयातील मुलांच्या आसपासचे वातावरण, त्यांची भावनिक आणि शारीरिक वाढ, त्यांची संगतसोबत आणि त्यांच्याशी साधला जाणारा संवाद याचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. अल्पवयातल्या गुन्हेगारांना शिक्षा आणि त्यांचे समुपदेशन अशा दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत त्यांना जाणीव करून देण्यासोबत बालगुन्हेगारीचे समाजावर होणारे दूरगामी परिणामही लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने बालगुन्हेगारांचे वय १६ पर्यंत खाली आणल्यामुळे या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. मात्र, कायद्यापेक्षा बालगुन्हेगारी रोखणे ही समाजाचीही तेव्हढीच जबाबदारी आहे. अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये सुधारणा होण्यासाठी सुधारगृहे चालवली जातात. त्यांचा दर्जा आणि तेथील वागणूक यामुळे या मुलांवर नेमका उलटा परिणाम होतो. मुले सुधारण्याऐवजी बिघडत जातात. त्यांच्यातील गुन्हेगारीवृत्ती बळावत जाते, ही वस्तुस्थिती आहे. तिथे गेल्यावर राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या अन्य आरोपींसोबत त्यांची ओळख होते. त्यातून त्यांची टोळी तयार होते. पुढे हीच मुले सुधारण्याऐवजी चोऱ्या, घरफोड्या, दरोड्यांसारखे गुन्हे करण्यात सराईत होतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने बाल गुन्हेगारांचे वय १६ पर्यंत कमी केल्यामुळे त्याचा पोलीस यंत्रणेला आणि न्यायसंस्थेला फायदा होणार आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाल्यास त्यापासून इतर धडा घेतील. कायद्याचा धाकच त्यांना रोखू शकतो.>महागडे कपडे आणि वेगवान दुचाकींची ‘क्रेझ’ त्यांच्यामध्ये आहेच. त्यामुळेच रात्री-बेरात्री दुचाकीचालकांना अडवून त्यांना लुटण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे.>बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांमधील अल्पवयीन आरोपींचे प्रमाण लक्षणीय आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही अल्पवयीन आरोपींचेच प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. >गुन्हेगारीकडे वळणारी ही पावले रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि समाजासमोर आहे. केवळ दंडुकेशाहीने हा प्रश्न सुटणारा नाही. अल्पवयीन गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनाच मुलांसोबतचा संवाद वाढवावा लागणार आहे. >शालेयस्तरावरही मुलांना त्याचे धोके समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये आणि समाजाला वेठीस धरणारा गुन्हेगार तयार होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.