शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् बच्चू कडू निघाले गुवाहाटीला; बंडामागे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 18:33 IST

सगळेजण मंत्रिपदे मागत होती. पण आम्हाला मंत्रालयच भेटले मग मंत्रिपदाचे काय आहे असं विधान बच्चू कडू यांनी केले.

पुणे – दिव्यांगांच्या आंदोलनापासून दिव्यांग मंत्रालयापर्यंत प्रवास गेला आहे. मला एकनाथ शिंदे यांचं खासकरून आभार आणि कौतुक करायचे आहेत. मी अडीच वर्ष राज्यमंत्री होतो. मी दिव्यांग मंत्रालय करा यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु ते झाले नाही. त्यात ते सरकार पडले. आणि मलाही गुवाहाटीला बोलावणे झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला त्यानंतर मी गुवाहाटीच्या वाटेला लागलो असा खुलासा बच्चू कडू यांनी केला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, मला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला तेव्हा सगळ्यात आधी त्यांना सांगितले. पहिले दिव्यांग मंत्रालय करा त्यानंतर मी येतो नाहीतर येत नाही आणि आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर बदनाम झालो. एवढे बदनाम झालो की सगळीकडे ५० खोके, ५० खोके सुरु होते. मला बदनामीची काही चिंता नाही. आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्रात निर्माण केले. आम्ही बदनाम झालो पण तुमच्यासाठी मजबुतीने उभे आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच बदनामीचं काय करायचे? पण या बदनामीतून जर एखाद्या दिव्यांगाला त्याला त्याचे घर मिळत असेल तर त्याहून जास्त आनंद काय असेल. सगळेजण मंत्रिपदे मागत होती. पण आम्हाला मंत्रालयच भेटले मग मंत्रिपदाचे काय आहे. यापेक्षा मोठे काय आहे. मुख्यमंत्री होऊन जास्त आनंद झाला नसता तेवढा दिव्यांग मंत्रालय झाल्याने झाला. सध्या दिव्यांग मंत्रालयाला मंत्री नाही, आयुक्त नाही, कर्मचारी नाही. दिव्यांग मंत्रालयाचे आयुक्त लवकर नेमू असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारला सुनावले

केंद्र सरकार नामर्दासारखे वागते, फक्त सत्ता टिकावी म्हणून ग्राहकांचा विचार केला मग पिकवणाऱ्यांचा विचार सरकार का करत नाही. ही नालायक प्रवृत्ती आहे. मी जरी एनडीएमध्ये, सत्तेत असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूने हे विधान मला करावेच लागेल. भाव वाढले तर हस्तक्षेप करता मग भाव कमी झाल्यावर सरकार हस्तक्षेप का करत नाही असा सवाल बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला विचारला.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस