शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् बच्चू कडू निघाले गुवाहाटीला; बंडामागे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 18:33 IST

सगळेजण मंत्रिपदे मागत होती. पण आम्हाला मंत्रालयच भेटले मग मंत्रिपदाचे काय आहे असं विधान बच्चू कडू यांनी केले.

पुणे – दिव्यांगांच्या आंदोलनापासून दिव्यांग मंत्रालयापर्यंत प्रवास गेला आहे. मला एकनाथ शिंदे यांचं खासकरून आभार आणि कौतुक करायचे आहेत. मी अडीच वर्ष राज्यमंत्री होतो. मी दिव्यांग मंत्रालय करा यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु ते झाले नाही. त्यात ते सरकार पडले. आणि मलाही गुवाहाटीला बोलावणे झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला त्यानंतर मी गुवाहाटीच्या वाटेला लागलो असा खुलासा बच्चू कडू यांनी केला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, मला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला तेव्हा सगळ्यात आधी त्यांना सांगितले. पहिले दिव्यांग मंत्रालय करा त्यानंतर मी येतो नाहीतर येत नाही आणि आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर बदनाम झालो. एवढे बदनाम झालो की सगळीकडे ५० खोके, ५० खोके सुरु होते. मला बदनामीची काही चिंता नाही. आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्रात निर्माण केले. आम्ही बदनाम झालो पण तुमच्यासाठी मजबुतीने उभे आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच बदनामीचं काय करायचे? पण या बदनामीतून जर एखाद्या दिव्यांगाला त्याला त्याचे घर मिळत असेल तर त्याहून जास्त आनंद काय असेल. सगळेजण मंत्रिपदे मागत होती. पण आम्हाला मंत्रालयच भेटले मग मंत्रिपदाचे काय आहे. यापेक्षा मोठे काय आहे. मुख्यमंत्री होऊन जास्त आनंद झाला नसता तेवढा दिव्यांग मंत्रालय झाल्याने झाला. सध्या दिव्यांग मंत्रालयाला मंत्री नाही, आयुक्त नाही, कर्मचारी नाही. दिव्यांग मंत्रालयाचे आयुक्त लवकर नेमू असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारला सुनावले

केंद्र सरकार नामर्दासारखे वागते, फक्त सत्ता टिकावी म्हणून ग्राहकांचा विचार केला मग पिकवणाऱ्यांचा विचार सरकार का करत नाही. ही नालायक प्रवृत्ती आहे. मी जरी एनडीएमध्ये, सत्तेत असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूने हे विधान मला करावेच लागेल. भाव वाढले तर हस्तक्षेप करता मग भाव कमी झाल्यावर सरकार हस्तक्षेप का करत नाही असा सवाल बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला विचारला.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस