शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: लोक दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल? अडीच वर्षे नवीन काय घडवलं?; फडणवीसांचा राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 20:31 IST

Maharashtra Politics: सीमावादाच्या मुद्द्यावरून राजकारण करता येत नाही, ही विरोधकांची खंत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीने महामोर्चासाठी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. यातच नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जे तिकडे गेले ते सगळे दलाल आहेत आणि ते आपल्या कामासाठी गेलेले आहेत, असे म्हटले आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांवर पलटवार केला आहे. 

संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास उरलेला नाही, म्हणून लोकं जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल?, कालपर्यंत ते चांगले आज ते दलाल. मला असे वाटते की ही जी भाषा ते वापरतात, आता लोकांना या भाषेचा रागदेखील येतो आणि लोक त्यांना गांभीर्याने घेतही नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

ते राजकारण आता त्यांना करता येणार नाही, ही त्यांची खंत आहे

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे म्हणाले की, यामध्ये काही नवीन घडले नाही. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते होते ना अडीच वर्षे त्यांनी काय नवीन घडवलं? एका बैठकीत नवीन घडेल असे कधीच होत नाही. एक संवादाची सुरुवात झाली आहे. तणाव दूर करण्यासाठी ही बैठक झालेली आहे. त्यांना खरे म्हणजे या गोष्टीची चिंता आहे की, या विषयाला धरून ते जे काही राजकारण करू इच्छित होते, ते राजकारण आता त्यांना करता येणार नाही, ही त्यांची खंत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत