शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Maharashtra Politics: निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव नाही? देवेंद्र फडणवीस सांगितलं राज‘कारण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 16:47 IST

Maharashtra News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेवर उद्धव ठाकरेंचे नाव नसल्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics: विधिमंडळात लावण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली असून २३ जानेवारी रोजी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे. या तैलचित्र अनावरण सोहळ्याची कार्यक्रमपत्रिका छापण्यात आली आहे. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेत ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्याचे नाव नाही किंवा स्व. बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचेही नाव नाही. त्यामुळे तैलचित्रावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रम पत्रिकेत ठाकरेंच्या कुटुंबातील कोणाचेही नाव नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या तैलचित्राचे अनावरण होत आहे. तर, प्रमुख उपस्थिती म्हणून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. मात्र, यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव नसल्यावर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव नाही?

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबाबत मला कल्पना नाही. हा कार्यक्रम सरकार ठरवत नाही, त्यामुळे मला याबाबत माहिती नाही, असे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली. ज्यांचे संपूर्ण आयुष्य घोटाळे करण्यात गेले, त्यांना सीमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख आहे. कारण सीमेंट कॉंक्रीटचे रस्ते झाले, तर पुढची ४० वर्ष नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही. दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा एवढेच आतापर्यंत सुरू होते. २०१८ साली जेव्हा चौकशी झाली, तेव्हा मुंबईतील २०० रस्त्यांमध्ये खालची पातळीच नव्हती. अशा प्रकारची कामे त्यांनी २५ वर्ष केली. आता त्यांच्या लक्षात येते आहे की, आपली दुकानदारी बंद करण्याचे काम हे काँक्रीट रस्ते करत आहेत, म्हणून त्यांची ओरड सुरू आहे, त्यांना आता मुंबईतील जनताच उत्तर देईल, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दरम्यान, मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होता. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला? आणि ६००० कोटी रुपयांचे काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे