शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले - शाहू महाराज यांनी ठणकावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:00 IST

विश्वास पाटील मुंबई : भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरून चालण्याचीच भूमिका बजावली; परंतु असे गृहीत धरून चालण्याचे दिवस आता संपले आहेत. सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या पीछेहाटीमुळे समाजबांधव अस्वस्थ झाला आहे. समाजाचा आक्रोश रास्त आहे, म्हणूनच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नोकरी व शिक्षण क्षेत्रातील आरक्षण देण्यासह मराठा समाजाच्या ...

विश्वास पाटील मुंबई : भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरून चालण्याचीच भूमिका बजावली; परंतु असे गृहीत धरून चालण्याचे दिवस आता संपले आहेत. सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या पीछेहाटीमुळे समाजबांधव अस्वस्थ झाला आहे. समाजाचा आक्रोश रास्त आहे, म्हणूनच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नोकरी व शिक्षण क्षेत्रातील आरक्षण देण्यासह मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचे व्यापक धोरण जाहीर करा, अशी स्पष्ट मागणी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.बुधवारी मुंबईत निघणाºया विराट मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता शाहू महाराज म्हणाले, ‘आजपर्यंत मराठा समाजाने संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय शांततेने मोर्चे काढले. या मोर्चातून मराठा समाजाचा आक्रोश पाहायला मिळाला. इतके होऊनही जर सरकार गांभीर्याने दखल घेणार नसेल, तर मराठा समाज आक्रमक बनेल. तोपर्यंत सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. मराठे आता त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पेटून उठले आहेत.राजर्षी शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांसह बहुजन समाजाला संस्थानच्या नोकºयांत पन्नास टक्के आरक्षण दिले. शिक्षणाची द्वारे सर्वांसाठी खुली केली. शाहू महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहूंचा हा विचार जसाच्या तसा अमलात आणला गेला नाही. तो अमलात आणणे आवश्यक होते. जर राजर्षी शाहू महाराजांची भूमिका जशीच्या तशी स्वीकारली असती, तर आज हे चित्रच दिसले नसते.आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी या समाजाच्या उन्नती करता जेवढे लक्ष द्यायला पाहिजे होते तेवढे दिले नाही, म्हणूनच मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले आहेत. राज्यकर्ते आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, ही भूमिका घेऊन आज मराठे लढत आहेत. पाणी गळ्यापर्यंत आले आहे, यापुढे हा समाज सहन करण्याच्या स्थितीत नाही. कायदे बदलून आरक्षण द्यावेच लागेल. तोपर्यंत मराठा समाजाचा राग शांत होणार नाही, असे शाहू महाराज यांनी बजावले.आरक्षण देणार कसे..?आरक्षण कसे देणार? हाही प्रश्न आहे. महाराष्टÑातील मराठा समजाला आरक्षण मिळेलही, पण राज्याबाहेरील मराठा समाजाचे काय? मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, ओडिसा, तामिळनाडू, गोवा, बिहार, पंजाब, दिल्ली आदी राज्यांतही मराठा समाज आहे. तिथल्या मराठ्यांची अवस्था फारच वाईट आहे, त्यांनाही न्याय मिळायला हवा.फडणवीस यांनी पुढाकार घ्यावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिकेतून महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मराठा समाजाच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करावी. यानिमित्ताने राज्य शासन सर्वसमावेशक व पुरोगामी असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे त्यांनी म्हटले आहे.प्रशासकीय सेवेत स्थान द्याभारतीय लष्करात तसेच प्रशासकीय सेवेतील मराठा समाजाचे प्रमाण बेताचेच आहे, ते वाढवायचे असेल तर राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एन.डी.ए.), प्रशासकीय सेवा भरती सारख्या परीक्षांतही मराठ्यांना स्वतंत्र प्रर्वगात आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी शाहू महाराज यांनी केली.