शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ग्राफिक डिझायनिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्येची जागतिक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 05:51 IST

जागतिक कौशल्य स्पर्धेत १ सुवर्ण, १ रजत आणि २ कांस्य पदकांसह भारताने १३ वे स्थान पटकावले.

- सीमा महांगडेमुंबई : जागतिक कौशल्य स्पर्धेत १ सुवर्ण, १ रजत आणि २ कांस्य पदकांसह भारताने १३ वे स्थान पटकावले. विशेष उल्लेखनीय म्हणजे या स्पर्धेतील ग्राफिक डिझायनिंग या स्पर्धेत ५० पैकी ४९ गुण मिळवत कांस्य पदक मिळवणारी श्वेता रतनपुरा ही महाराष्टÑाची कन्या आहे.दर दोन वर्षांनी जागतिक स्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा रशियातील कझान येथे २२ ते २७ आॅगस्ट दरम्यान ४५ वी जागतिक कौशल्य स्पर्धा पार पडली. ६० देशांच्या विविध ५६ कौशल्य स्पर्धांमध्ये तब्बल १६०० तरुण सहभागी झाले होते. यात मोबाइल रोबोटिक्स, प्रोटोटाइप मॉडेलिंग, हेअरड्रेसिंग, बेकिंग, कन्फेक्शनरी आणि पॅटीसेरी, वेल्डिंग, कार पेंटिंग, फ्लोरिस्ट्री आदी कौशल्यांचा समावेश होता. यातील ४४ कौशल्य स्पर्धांमध्ये ४८ स्पर्धकांनी भारताचे नेतृत्व केले. यामधील वॉटर टेक्नॉलॉजी स्पर्धेत भारताला सुवर्ण, वेब टेक्नॉलॉजीत रजत तर ग्राफिक डिझायनिंग व ज्वेलरी स्पर्धेत कांस्य पदक मिळाले. वेब डिझायनिंगमध्ये कांस्य पदक पटकावणारी श्वेता १८ वर्षांपासून महाराष्टÑात, पुणे येथे राहते. तर भारताचे प्रतिनिधित्व करत पदकांचे मानकरी ठरलेले इतर विद्यार्थी ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटकचे आहेत.नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन, अहमदाबादची विद्यार्थिनी असलेल्या श्वेताने सांगितले की, पदवी घेऊनही केवळ आपल्या देशासाठी ही स्पर्धा जिंकायची या एकमेव ध्येयाने नोकरी न करता संपूर्ण वेळ स्पर्धेची तयारी करण्याचा निर्णय तिने घेतला. वर्षभरापासून या स्पर्धेची तयारी करत होते. इंडिया स्किल्स स्पर्धा सुरू झाल्यापासून महाविद्यालय, विभागीय, राज्य आणि त्यानंतर देशपताळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होत अखेर ग्राफिक डिझायनिंग गटात जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली, असे श्वेताने सांगितले. स्पर्धेत कोणत्याही राज्याची प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते तर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते. स्टेजवर उभे राहून भारताचा तिरंगा उंचावत भारताची प्रतिनिधी म्हणून कांस्य पदक स्वीकारणे हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण होता, असे श्वेताने सांगितले.महाराष्टÑाच्या शिरपेचात मानाचा तुरायापूर्वी भारतात झालेल्या स्किल इंडिया स्पर्धेत २३ पदकांची कमाई करत महाराष्टÑाने पहिले स्थान पटकावले होते. या स्पर्धेत श्वेतानेही कांस्य पदकाची कमाई करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारतातून निवड करण्यात आलेल्या ४८ स्पर्धकांपैकी श्वेतासह तब्बल ७ विद्यार्थी हे महाराष्टÑातील होते.राज्याच्या आयटीआयसाठी अभिमानाची गोष्टभारताला मिळालेले हे यश महाराष्ट्रातील आयटीआयसाठी अभिमानाची गोष्ट असून इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे आहे. आयटीआयच्या पुढील प्रगतीसाठी आम्ही अनेक कंपन्यांसोबत आणि राज्य सरकारसोबत टायअप करून अधिकाधिक अद्ययावत होण्याच्या प्रयत्नात आहोत. यामुळे शासकीय शैक्षणिक संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल अशी अपेक्षा आहे.- दीपेंद्र सिंह कुशवाह, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Indiaभारत