शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दहीहंडीच्या २० फूट उंचीच्या नियमाची 'ऐशीची तैशी'

By admin | Updated: August 25, 2016 11:30 IST

दहीहंडीची उंची २० फूट ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा नियम गोविंदा मंडळांनी पायदळी तुडवल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २५ - दहीहंडीची उंची २० फूट ठेवण्याचा आणि बालगोविंदांना बंदीचा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र हा नियम गोविंदा मंडळांनी पायदळी तुडवल्याचे चित्र राज्यभरात दिसत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व नियम पायदळी तुडवत ठाण्यात ४० फूटांवर दहीहंडी बांधली आहे. नौपाडा येथे रचलेल्या या हंडीला 'कायदाभंग' असं नाव देण्यात आले असून ९ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेने ११ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पारंपरिक पद्धतीनेच नऊ थरांची हंडी लावण्याचा निर्धार व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. 
(थरार की निर्बंध?)
  •  
दरम्यान डोंबिवलीतही न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाले असून डोंबिवलीतील नव साई गोविंदा पथकाने  ५ थरांचा मनोरा रचत २० फूटांपेक्षा जास्त सलामी दिली.
तसेच गोरेगाव येथील गावदेवी महिला गोविंदा पथकाकडून ५ थर लावण्यात आले असून त्यांनी उंची व वयाची मर्यादा या दोन्हींचाही भंग केला आहे.
 
दादरमध्ये गोविंदा पथकाने झोपून नऊ थर रचले
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ दादरमध्ये कोकण नगर या गोविंदा मंडळाने जमिनीवर झोपून ९ थर लावत न्यायालयाच्या निर्णयाचा प्रतिकात्मक निषेध केला. कोकणनगर मंडळाने याठिकाणी झोपून नऊ थर लावले. दादर पश्चिमेला स्थानकाच्या परिसरात गेली ५० वर्षे हंडी उभारण्याची परंपरा आहे. ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील अनेक नावाजलेली पथके हजेरी लावतात. कोकणनगर हेदेखील याच मंडळांपैकी एक आहे. मुंबईतील जुन्या गोविंदा पथकांपैकी एक म्हणून कोकणनगर मंडळाची ओळख आहे. गेल्या काही वर्षात हमखास आठ थर लावणारे पथक म्हणून या मंडळाने ओळख निर्माण केली होती. मात्र, यंदा न्यायालयाच्या २० फुटांच्या मर्यादेमुळे कोकणनगर गोविंदा पथकाला चारपेक्षा जास्त थर रचता येणार नाहीत. त्यामुळेच या नाराज मंडळाने प्रतिकात्मक निषेध नोंदवला, 
 
 
 
 

Mumbai: After SC order of 20 ft cap for human pyramids,'Govindas' in Dadar make a 20+ ft pyramid lying on ground pic.twitter.com/VbpGlzeqiN

— ANI (@ANI_news) August 25, 2016 nt-family: itf_devanagarimediumfont; line-height: 26px;">
 
मुळात उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निमयांचे पालन होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय समित्या स्थापन केलेल्या नाहीत. त्यामुळे उत्सवात नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी कोण करणार? याबाबत संभ्रम आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा पथकांकडून रचल्या जाणाऱ्या थरांचे चित्रीकरण करून त्यात दोषी आढळणाऱ्या गोविंदावर कारवाई केली जाईल. मात्र, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे परिसरात शेकडो आयोजक असून, हजारो गोविंदा पथकांमधून लाखो गोविंदा उत्सवात सामील होतात. त्यांचे चित्रीकरण कसे करणार? आणि इतक्या मोठ्या संख्येवर कारवाई कशी होणार? हे प्रश्न अद्यापही निरुत्तरीतच आहेत.