शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराचे ओझे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:53 IST

शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवर आजही ५ ते १० किलोंपर्यंत वजनाचे दप्तर असल्याचे दिसून येते

पुणे : शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवर आजही ५ ते १० किलोंपर्यंत वजनाचे दप्तर असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची बाब केवळ चर्चात्मक पातळीवरच आहे. शिक्षण विभागाकडूनही दप्तरतपासणी मोहिमेकडे दुर्लक्ष केले जात आहे. न्यायालयाने आदेश देऊनही राज्य शासन, पालक व शाळांकडून या गोष्टीकडे गंभीरपणे पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे.राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच, विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे वजन किती, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार राज्य शासनाने अध्यादेश प्रसिद्ध केला होता. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के वजनाचे दप्तर त्याच्या पाठीवर असणे अपेक्षित आहे. एका वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरीही शाळांकडून त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.शाळांनी विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार दप्तर आणण्यास सांगणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षकांकडून सर्व विषयांची पुस्तके व वह्या आणण्यास सांगितले जाते. विद्यार्थी वह्या-पुस्तकांबरोबरच वॉटर बॅग, जेवणाचा डबा, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्य वर्गात घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार वाढत आहे. प्रत्यक्षात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करून देणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील बहुतांश शाळांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांना वॉटर बॅग आणावी लागते.शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर व मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण आहे. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या अनेक शाळांमध्ये राज्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाला यश आले नाही. शहरात इंग्रजी माध्यमाच्या व सीबीएसई बोर्डाच्या शाळांची संख्या अधिक आहे. शाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी होत आला, तरीही शिक्षण विभागाने शाळांना अचानक भेट देऊन दप्तर तपासणी मोहीम राबविली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते.