शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

दप्तराचे ओझे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:53 IST

शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवर आजही ५ ते १० किलोंपर्यंत वजनाचे दप्तर असल्याचे दिसून येते

पुणे : शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवर आजही ५ ते १० किलोंपर्यंत वजनाचे दप्तर असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची बाब केवळ चर्चात्मक पातळीवरच आहे. शिक्षण विभागाकडूनही दप्तरतपासणी मोहिमेकडे दुर्लक्ष केले जात आहे. न्यायालयाने आदेश देऊनही राज्य शासन, पालक व शाळांकडून या गोष्टीकडे गंभीरपणे पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे.राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच, विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे वजन किती, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार राज्य शासनाने अध्यादेश प्रसिद्ध केला होता. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के वजनाचे दप्तर त्याच्या पाठीवर असणे अपेक्षित आहे. एका वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरीही शाळांकडून त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.शाळांनी विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार दप्तर आणण्यास सांगणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षकांकडून सर्व विषयांची पुस्तके व वह्या आणण्यास सांगितले जाते. विद्यार्थी वह्या-पुस्तकांबरोबरच वॉटर बॅग, जेवणाचा डबा, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्य वर्गात घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार वाढत आहे. प्रत्यक्षात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करून देणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील बहुतांश शाळांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांना वॉटर बॅग आणावी लागते.शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर व मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण आहे. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या अनेक शाळांमध्ये राज्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाला यश आले नाही. शहरात इंग्रजी माध्यमाच्या व सीबीएसई बोर्डाच्या शाळांची संख्या अधिक आहे. शाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी होत आला, तरीही शिक्षण विभागाने शाळांना अचानक भेट देऊन दप्तर तपासणी मोहीम राबविली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते.