वाशिम : मतदान आयोगाने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या मतदार नोंदणी अभियानाचा केंद्रस्तरिय अधिकार्यांनी पुरता फज्जा उडविला आहे. २८ व २९ जूनचे विशेष अभियानही यातून सुटले नाही. उभय दिवशी प्रत्येक केंद्रस्तरिय कर्मचार्यांनी ११ ते पाच वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित राहून मतदारांची नोंदणी करून घ्यावी असे आयोगाचे स्पष्ट आदेश असतानाही बीएलओंनी या आदेशांना धाब्यावर बसविले . लोकमतने केलेल्या स्टिंग मध्ये बहुतांश मतदान केंद्र २८ जून रोजी कुलुपबंद आढळून आले.एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत सदोष निवडणूक याद्यांचा मुद्दा कमालीचा गाजला होता. अनेक मतदारांचे अचानक मतदान यादीतून नावे गहाळ झाली होती तर अनेकांच्या मतदान केंद्रांमध्ये बदल झाले होते. यादीतील हे दोष दुर करून नविन मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी मतदान आयोगाने ९ जूनपासून मतदान नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. २८ व २९ या दोन दिवस विशेष अभियानही राबविण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही दिवशी संबधित केंद्रस्तरिय अधिकार्याला सकाळी ११ वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील केंद्रस्तरिय अधिकार्यांनी आयोगाच्या या आदेशांना केराची टोपली दाखविली आहे. आज वेिशष अभियानाचा पहिल्या दिवशीच बहुतांश बिएलओंनी मतदान केंद्रावरून दांडी मारली होती. नागरिक आपले मतदार नोंदणी अर्ज घैऊन या बीएलओंना शोधत होते. लोकमतने केलेल्या स्टिंगने हा प्रकार उजेडात आणला. दरम्यान बीएलओंना पाच वाजेपर्यंत केंद्रावरच उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते असे निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार गिरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मतदार नोंदणी अभियानाला बीएलओंची ‘दांडी’
By admin | Updated: June 28, 2014 23:43 IST