शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 03:06 IST

कोल्हापूर आणि सांगलीला सर्वाधिक फटका

पुणे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ जिल्ह्यांतील तब्बल २ लाख, १ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, कोल्हापूर आणि सांगलीला सर्वाधिक फटका बसला आहे. फळबागांचे नुकसान झाले असल्यास त्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत बागांची पुनर्उभारणी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.क्षीरसागर यांनी विभागातील कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात बैठक बोलावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र ओला दुष्काळाला सामोरा जात आहे. तर, मराठवाड्यात अजूनही सहाशे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, मांजरा आणि अन्य प्रकल्पात पाणी नाही. पश्चिम महाराष्ट्रात उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रांनुसार दोन लाखांहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. फळबागांसह इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. फळबागांच्या नुकसानीसाठी सरकार संपूर्ण मदत देईल. खड्डे खोदण्यापासून ते रोपे देण्यापर्यंत संपूर्ण मदत केली जाईल. शिवाय मागेल त्याला शेततळे हे धोरण राबविण्यात येईल.आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्हे, कायम दुष्काळी तालुके आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७७ तालुक्यांमधे ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान दिले जाईल. तसेच, मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती पाहता, मागेल त्याला काम हे धोरण तेथे राबविण्यात येईल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.पुरामुळे बाधित झालेल्या शेतीचा प्राथमिक अंदाज(क्षेत्र हेक्टरमधे)जिल्हा बाधित क्षेत्ररायगड १७,७५५.२०ठाणे २,१७५.०२सिंधुदुर्ग ९,७९४.२०पालघर ११,४८४.३१धुळे १,२२३.६०नाशिक २२,३३४.१०सातारा २३,११६.५३सांगली २०,५७१कोल्हापूर ६,८६१०पुणे १२,८९१सोलापूर १०,८२०.२०अहमदनगर ६४४वर्धा ७७

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर