शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे, छत्रपती संभाजीराजेंनी केलं शांततेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 12:51 IST

भीमा कोरेगाव घटनेमुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आणि दलित समाजाला शांततेने राहण्याचं आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली- भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव घटनेमुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आणि दलित समाजाला शांततेने राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘मराठा समाजाला मी एवढंच सागेंन की, आपण मोठा भाऊ आहोत आणि दलित समाज आपला धाकटा भाऊ आहे. त्यामुळे बहुजन समाजाला एकत्र घेऊन आपल्याला नांदायचं आहे.’ असं म्हणत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. 

शिवाजी महाराज, शाहु-फुले-आंबेडकर यांच्या भूमीत ही घटना घडणं दुर्दैव आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा 'काळा दिवस' आहे.भीमा-कोरेगावची घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरच निंदनीय आहे.  आपण संयम पाळला पाहिजे.’ असंही संभाजीराजे यांनी यावेळी म्हंटलं. ‘जे समाजाला विघातक मार्गाला लावण्याचं काम करत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. मग ते कोणीही असू दे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण पुन्हा महाराष्ट्रात आम्हाला हा दिवस पाहायचा नाही, असंही संभाजीराजे यांनी म्हंटलं आहेमराठा समाजाला मी एवढंच सागेंन की, आपण मोठा भाऊ आहोत आणि दलित समाज आपला धाकटा भाऊ आहे. बहुजन समाजाल एकत्र घेऊन आपल्याला नांदायचं आहे.’ असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव