शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

डहाणू, बोर्डीचा पर्यटन विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 03:08 IST

पर्यावरण व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात

डहाणू : येथील पर्यावरण व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात. परंतु त्यांना पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटेल. सुखाने रहावेसे वाटेल अशी स्थिती मात्र नाही. प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यामुळे येथला पर्यटन विकास खुंटला आहे. या बाबीकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे. ना जिल्हा प्रशासनाचे त्यामुळे विस्तीर्ण किनारे, सुरुंच्या बागा असे वैभव असूनही पर्यटन विकासाबाबत डहाणू तालुका मागासलेलाच राहिला आहे. डहाणू ते बोर्डी या १८ कि.मी रस्त्याची दुर्दशा झाल्याने पर्यटकांना अनुभव येतो तो गचके खात प्रवास करण्याचा. पालघर जिल्हयाच्या पश्चिम किनारपट्टीवरिल निसर्ग सौंदर्याने नटलेला चिंचणी, वाढवण, डहाणू समुद्र किनारा, नरपड बीच, आगर, चिखला आणि बोर्डी बीच, तसेच ऐतिहासिक डहाणू किल्ला या वास्तू पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु त्यांना तिथे येतांना अनुभव मात्र निराशाजनक येतात. तसेच येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, आशागडचे संतोषी माता मंदिर याबरोबर बोर्डीचा बारडाचा गड, गंभीर गड, भीम बांध या ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना चांगले रस्ते, स्वच्छ परीसर, स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी या बाबीही दुर्मिळ आहेत. धाकटी डहाणू आणि डहाणू गाव या दोन गावामधून वाहणारी खाडी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. हे दृष्य पाहिल्यावर या स्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्यावीशी वाटेल. या भागात जवळपास ३ हजाराहून अधिक मच्छीमारीचा बोटीतून पारंपारिक व्यवसाय केला जातो. तर निसर्गाने समृद्ध असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात नारळी, पोफळी, केळी, आंबा, चिकू आणि मिरचीच्या या भागात बागा असून त्यामधून बागायती व्यवसायाला चालना मिळते आहे. परंतु याचा पर्यटनासाठी वापर करून घेण्याची कल्पकता ना पालिका दाखविते आहे, ना जिल्हा प्रशासन निरेसाठी प्रसिद्ध माड आणि खजुरापासून मिळणारी नीरा डहाणू तालुक्यात मुबलक आहे. सूर्या प्रकल्पामुळे उजवा अणि डावा तीर कालव्यातून शेतीला पाणी उपलब्ध झाल्यामुळे बारमाही शेतीतून शेतकरी उत्पन्न मिळवू लागले आहेत. तसेच लिली, मोगरा, झेंडूच्या फुलांची बागायती शेती केली जाते. ती ही बघण्यासारखी असते. त्यात चित्रपटांचे अथवा मालिकांचे शुटींगही होऊ शकते. परंतु त्याचा तसा वापर करण्याची योजकता दाखविली जात नाही. (वार्ताहर)।वारली चित्रकला आणि तारपा नृत्य : डहाणूची सांस्कृतिक ओळख म्हणजे वारली चित्रकला आणि तारपा नृत्य ही आहे. आदिवासींचे सण, उत्सव लग्न सोहळे यामध्ये काढली जाणारी लग्न चौकातून आकर्षित करणारी वारली चित्रकला पर्यटकांच्या कौतुकाचा विषय असली तरी तिचा पर्यटनदृष्ट्या अविष्कार घडविण्याचे प्रयत्न होत नाही. तर आनंद साजरा करण्यासाठी होणारे तारपा नृत्य ही आदिवासींची खास नृत्य शैली या भागात पाहायला मिळते. तिचाही अविष्कार कुठे घडविला जात नाही. हे चित्र कधी बदलणार असा डहाणूकरांचा सवाल आहे.