शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

डहाणू, बोर्डीचा पर्यटन विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 03:08 IST

पर्यावरण व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात

डहाणू : येथील पर्यावरण व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात. परंतु त्यांना पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटेल. सुखाने रहावेसे वाटेल अशी स्थिती मात्र नाही. प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यामुळे येथला पर्यटन विकास खुंटला आहे. या बाबीकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे. ना जिल्हा प्रशासनाचे त्यामुळे विस्तीर्ण किनारे, सुरुंच्या बागा असे वैभव असूनही पर्यटन विकासाबाबत डहाणू तालुका मागासलेलाच राहिला आहे. डहाणू ते बोर्डी या १८ कि.मी रस्त्याची दुर्दशा झाल्याने पर्यटकांना अनुभव येतो तो गचके खात प्रवास करण्याचा. पालघर जिल्हयाच्या पश्चिम किनारपट्टीवरिल निसर्ग सौंदर्याने नटलेला चिंचणी, वाढवण, डहाणू समुद्र किनारा, नरपड बीच, आगर, चिखला आणि बोर्डी बीच, तसेच ऐतिहासिक डहाणू किल्ला या वास्तू पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु त्यांना तिथे येतांना अनुभव मात्र निराशाजनक येतात. तसेच येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, आशागडचे संतोषी माता मंदिर याबरोबर बोर्डीचा बारडाचा गड, गंभीर गड, भीम बांध या ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना चांगले रस्ते, स्वच्छ परीसर, स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी या बाबीही दुर्मिळ आहेत. धाकटी डहाणू आणि डहाणू गाव या दोन गावामधून वाहणारी खाडी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. हे दृष्य पाहिल्यावर या स्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्यावीशी वाटेल. या भागात जवळपास ३ हजाराहून अधिक मच्छीमारीचा बोटीतून पारंपारिक व्यवसाय केला जातो. तर निसर्गाने समृद्ध असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात नारळी, पोफळी, केळी, आंबा, चिकू आणि मिरचीच्या या भागात बागा असून त्यामधून बागायती व्यवसायाला चालना मिळते आहे. परंतु याचा पर्यटनासाठी वापर करून घेण्याची कल्पकता ना पालिका दाखविते आहे, ना जिल्हा प्रशासन निरेसाठी प्रसिद्ध माड आणि खजुरापासून मिळणारी नीरा डहाणू तालुक्यात मुबलक आहे. सूर्या प्रकल्पामुळे उजवा अणि डावा तीर कालव्यातून शेतीला पाणी उपलब्ध झाल्यामुळे बारमाही शेतीतून शेतकरी उत्पन्न मिळवू लागले आहेत. तसेच लिली, मोगरा, झेंडूच्या फुलांची बागायती शेती केली जाते. ती ही बघण्यासारखी असते. त्यात चित्रपटांचे अथवा मालिकांचे शुटींगही होऊ शकते. परंतु त्याचा तसा वापर करण्याची योजकता दाखविली जात नाही. (वार्ताहर)।वारली चित्रकला आणि तारपा नृत्य : डहाणूची सांस्कृतिक ओळख म्हणजे वारली चित्रकला आणि तारपा नृत्य ही आहे. आदिवासींचे सण, उत्सव लग्न सोहळे यामध्ये काढली जाणारी लग्न चौकातून आकर्षित करणारी वारली चित्रकला पर्यटकांच्या कौतुकाचा विषय असली तरी तिचा पर्यटनदृष्ट्या अविष्कार घडविण्याचे प्रयत्न होत नाही. तर आनंद साजरा करण्यासाठी होणारे तारपा नृत्य ही आदिवासींची खास नृत्य शैली या भागात पाहायला मिळते. तिचाही अविष्कार कुठे घडविला जात नाही. हे चित्र कधी बदलणार असा डहाणूकरांचा सवाल आहे.