शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

डहाणू, बोर्डीचा पर्यटन विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 03:08 IST

पर्यावरण व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात

डहाणू : येथील पर्यावरण व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात. परंतु त्यांना पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटेल. सुखाने रहावेसे वाटेल अशी स्थिती मात्र नाही. प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यामुळे येथला पर्यटन विकास खुंटला आहे. या बाबीकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे. ना जिल्हा प्रशासनाचे त्यामुळे विस्तीर्ण किनारे, सुरुंच्या बागा असे वैभव असूनही पर्यटन विकासाबाबत डहाणू तालुका मागासलेलाच राहिला आहे. डहाणू ते बोर्डी या १८ कि.मी रस्त्याची दुर्दशा झाल्याने पर्यटकांना अनुभव येतो तो गचके खात प्रवास करण्याचा. पालघर जिल्हयाच्या पश्चिम किनारपट्टीवरिल निसर्ग सौंदर्याने नटलेला चिंचणी, वाढवण, डहाणू समुद्र किनारा, नरपड बीच, आगर, चिखला आणि बोर्डी बीच, तसेच ऐतिहासिक डहाणू किल्ला या वास्तू पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु त्यांना तिथे येतांना अनुभव मात्र निराशाजनक येतात. तसेच येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, आशागडचे संतोषी माता मंदिर याबरोबर बोर्डीचा बारडाचा गड, गंभीर गड, भीम बांध या ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना चांगले रस्ते, स्वच्छ परीसर, स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी या बाबीही दुर्मिळ आहेत. धाकटी डहाणू आणि डहाणू गाव या दोन गावामधून वाहणारी खाडी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. हे दृष्य पाहिल्यावर या स्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्यावीशी वाटेल. या भागात जवळपास ३ हजाराहून अधिक मच्छीमारीचा बोटीतून पारंपारिक व्यवसाय केला जातो. तर निसर्गाने समृद्ध असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात नारळी, पोफळी, केळी, आंबा, चिकू आणि मिरचीच्या या भागात बागा असून त्यामधून बागायती व्यवसायाला चालना मिळते आहे. परंतु याचा पर्यटनासाठी वापर करून घेण्याची कल्पकता ना पालिका दाखविते आहे, ना जिल्हा प्रशासन निरेसाठी प्रसिद्ध माड आणि खजुरापासून मिळणारी नीरा डहाणू तालुक्यात मुबलक आहे. सूर्या प्रकल्पामुळे उजवा अणि डावा तीर कालव्यातून शेतीला पाणी उपलब्ध झाल्यामुळे बारमाही शेतीतून शेतकरी उत्पन्न मिळवू लागले आहेत. तसेच लिली, मोगरा, झेंडूच्या फुलांची बागायती शेती केली जाते. ती ही बघण्यासारखी असते. त्यात चित्रपटांचे अथवा मालिकांचे शुटींगही होऊ शकते. परंतु त्याचा तसा वापर करण्याची योजकता दाखविली जात नाही. (वार्ताहर)।वारली चित्रकला आणि तारपा नृत्य : डहाणूची सांस्कृतिक ओळख म्हणजे वारली चित्रकला आणि तारपा नृत्य ही आहे. आदिवासींचे सण, उत्सव लग्न सोहळे यामध्ये काढली जाणारी लग्न चौकातून आकर्षित करणारी वारली चित्रकला पर्यटकांच्या कौतुकाचा विषय असली तरी तिचा पर्यटनदृष्ट्या अविष्कार घडविण्याचे प्रयत्न होत नाही. तर आनंद साजरा करण्यासाठी होणारे तारपा नृत्य ही आदिवासींची खास नृत्य शैली या भागात पाहायला मिळते. तिचाही अविष्कार कुठे घडविला जात नाही. हे चित्र कधी बदलणार असा डहाणूकरांचा सवाल आहे.