शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

दादरच्या गणेश भुवनला पुरेसे पाणी मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:45 IST

मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक चाळींना कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक चाळींना कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. गिरगाव व दादरमधील जुन्या चाळींना या समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. दादरमधील ९५ वर्ष जुन्या गणेश भुवन या इमारतीलाही साधारण गेल्या दीड वर्षापासून कमी दाबाने पाणी येत असल्याने संतप्त रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

गणेश भुवन या तळमजला अधिक तीन मजली इमारतीमध्ये ८० कुटुंबे राहत आहेत, तर १० दुकाने आहेत. या इमारतीला पूर्वीपासून दुपारी ४ ते रात्री ७ वाजेपर्यंत जास्त दाबाने पाणीपुरवठा होत होता. मात्र, दीड वर्षापूर्वी पाणी कपातीच्या नावाखाली महापालिकेकडून इमारतीच्या पाण्याचा दाब कमी करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत पाणी येण्याची वेळ दुपारी चार ते रात्री सात, अशी असली तरी पूर्वीसारखे जास्त दाबाने पाणी येत नाही. परिणामी पुरेसे पाणी रहिवाशांना मिळत नाही.

आंदोलनाचा पवित्रा महापालिकेकडे याबाबत रहिवाशांनी तक्रार केली असता महापालिकेने पाण्याची टाकी बसविण्यास सांगितले. मात्र, १०० वर्षे जुन्या इमारतीवर पाण्याची टाकी कशी बसविणार ? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. दरम्यान, पाण्याचा दाब वाढवावा, या मागणीसाठी रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. लवकरच याप्रश्नी आंदोलन छेडण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही अधिकारी इमारतीमध्ये टाकी बसवा, अशी अव्यवहार्य सूचना देऊन निघून जात आहेत. जुन्या इमारतीमध्ये टाकी कशी बसविणार ? प्रेशर कमी न करता वेळ कमी केल्यास अडचण सुटेल. मात्र, प्रेशर कमी केल्याने वरच्या मजल्यावरील रहिवाशांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यावर तातडीने ठोस तोडगा काढावा, असे रहिवासी सिद्धेश देसाई म्हणाला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई