शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

दादरच्या गणेश भुवनला पुरेसे पाणी मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:45 IST

मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक चाळींना कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक चाळींना कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. गिरगाव व दादरमधील जुन्या चाळींना या समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. दादरमधील ९५ वर्ष जुन्या गणेश भुवन या इमारतीलाही साधारण गेल्या दीड वर्षापासून कमी दाबाने पाणी येत असल्याने संतप्त रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

गणेश भुवन या तळमजला अधिक तीन मजली इमारतीमध्ये ८० कुटुंबे राहत आहेत, तर १० दुकाने आहेत. या इमारतीला पूर्वीपासून दुपारी ४ ते रात्री ७ वाजेपर्यंत जास्त दाबाने पाणीपुरवठा होत होता. मात्र, दीड वर्षापूर्वी पाणी कपातीच्या नावाखाली महापालिकेकडून इमारतीच्या पाण्याचा दाब कमी करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत पाणी येण्याची वेळ दुपारी चार ते रात्री सात, अशी असली तरी पूर्वीसारखे जास्त दाबाने पाणी येत नाही. परिणामी पुरेसे पाणी रहिवाशांना मिळत नाही.

आंदोलनाचा पवित्रा महापालिकेकडे याबाबत रहिवाशांनी तक्रार केली असता महापालिकेने पाण्याची टाकी बसविण्यास सांगितले. मात्र, १०० वर्षे जुन्या इमारतीवर पाण्याची टाकी कशी बसविणार ? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. दरम्यान, पाण्याचा दाब वाढवावा, या मागणीसाठी रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. लवकरच याप्रश्नी आंदोलन छेडण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही अधिकारी इमारतीमध्ये टाकी बसवा, अशी अव्यवहार्य सूचना देऊन निघून जात आहेत. जुन्या इमारतीमध्ये टाकी कशी बसविणार ? प्रेशर कमी न करता वेळ कमी केल्यास अडचण सुटेल. मात्र, प्रेशर कमी केल्याने वरच्या मजल्यावरील रहिवाशांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यावर तातडीने ठोस तोडगा काढावा, असे रहिवासी सिद्धेश देसाई म्हणाला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई