शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरेंचे कार्य अभ्यासक्रमात यावे

By admin | Updated: March 20, 2015 01:05 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे ठराव अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनात समारोप समारंभात करण्यात आले.

पुणे : युवा संस्था व संमेलनांनी सामाजिक ध्येय गाठताना सामाजिक हिंसा, कृत्य करू नये; व्यक्तीने व्यक्तीवर विश्वास ठेवून संवाद वाढवावा, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे ठराव अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनात समारोप समारंभात करण्यात आले.टेकरेल आयोजित अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलनाचा समारोप बुधवारी झाला. त्यात या ठरावांसह दुष्काळी भागातील व गारपीट झालेल्या भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांची जबाबदारी कल्याणकारी शासनाने स्वीकारावी, युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय संमेलने घ्यावीत व माध्यमांचा योग्य वापर करावा, मराठी भाषेला जलदरीत्या अभिजात दर्जा द्यावा, असे ठराव करण्यात आले.तरुण रक्ताला भडकावण्याची कामे होतात; पण युवकांनी कोणत्याही संघटनेत सहभागी होण्यापूर्वी हजार वेळा विचार करणे आवश्यक आहे, असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.मोरे म्हणाले, ‘‘प्रत्येक धर्माकडे विवेकाने पाहिले पाहिजे, बुद्धीने नाही. धर्माचे विकृतीकरण थांबविण्याचे कार्य दाभोलकर करत असत.’’उल्हास पवार म्हणाले, ‘‘सध्या शब्दांचे रणकंदन सुरू आहे. याकरिता प्रत्येक गोष्टीचे विचार व त्यामागचा भावार्थ समजून घेणे आवश्यक आहे. लोकशाहीतून सारासार विचार संपत चालला आहे.तरुणांसाठी संमेलन हे चांगले व्यासपीठ आहे. यातून त्यांची वैचारिक पातळी वाढते व पायादेखील येथेच घातला जातो, अशी भावना उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी व्यक्त केली. सुभाष वारे म्हणाले, ‘‘आजची तरुणाई ही तक्रार करणारी नसून, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारी आहे. यासाठी त्यांना पाठिंबा व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.’’ सचिन परब, महेश थोरवे, भूषण कदम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्कृती, परंपरा जपली पाहिजे १ संस्कृती आणि परंपरा यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपली संस्कृती काय सांगते, याचा विचार करणे गरजेचे आहे. माणूस संस्कृतीला ओझे समजतोय आणि तसेच वागतोय, असे मत अर्थ साहित्य संस्कृती अभ्यासक अभय टिळक यांनी बुधवारी व्यक्त केले.२ युवा साहित्य संमेलनात ‘चौकटीबाहेरील चर्चा’ कार्यक्रमात ‘संस्कृती आणि मुक्त चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. संमेलनाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांनी मते नोंदविली.३ शरद तांदळे यांनी ‘मी उद्योजक का आहे?’ यावर मत मांडले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक उद्योजकाने हा विचार करायला हवा, की मी उद्योजक का झालो? तर, जगण्यासाठी झालो. एखादा उद्योग करताना आपल्याला अर्थकारण माहीत पाहिजे. जर नसेल तर त्याची माहिती करून घेतली पाहिजे.’’४ राजकुमार तांगडे यांनी ‘मी नाटक का करतो?’ या विषयावर मत नोंदविले. ते म्हणाले, ‘‘समाजात ज्या अन्यायकारक घटना घडतात, अशा घटनांवर नाटकाद्वारे प्रकाश टाकतो. आपल्या आतमध्ये जे आहे, ते लिहिण्याचा आणि व्यक्त करण्याचा प्रयत्न नाटकातून करीत आलोय.’’