शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण: उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:18 IST

दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणांचा तपास मंद गतीने करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का, असा सवाल उच्च न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी केला.

मुंबई : डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणातील तीन आरोपींची पुणे सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याने उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना धारेवर धरले. दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणांचा तपास मंद गतीने करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का, असा सवाल उच्च न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी केला.दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, यासाठी दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील अभय नेवगी यांनी दाभोलकर हत्येप्रकरणातील तीन आरोपींचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केल्याची माहिती दिली. त्यावर न्यायालयाने तपासयंत्रणेची ही निष्काळजी असल्याचे म्हटले.सीबीआयने उच्च न्यायालयात प्रगती तपास अहवाल सादर केला. तो वाचल्यावर न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने तपास मंद गतीने करण्याचा प्रयत्न केला होता का, अशी शंका उपस्थित केली. आधीच्या अहवालात सीबीआयने काही उजव्या जहालवादी संस्थेच्या सदस्यांची नावे नमूद केली होती; त्या लोकांवर काय कारवाई करणार, याची माहितीही दिली होती, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. याच सदस्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी सबळ पुराव्यांची आवश्यकता आहे. काही आरोपींनी जबाबात ज्या आरोपींची नावे घेतली; त्यावरून या सदस्यांच्या नावाचा उल्लेख अहवालात केला, असे सीबीआयतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले.दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब का?न्यायालयाने तपासयंत्रणांवर नाराजी दर्शवली. ‘तुमचे अधिकारी हुशार आणि अनुभवी आहेत. किती वेळेत दोषारोपपत्र दाखल करावे, याची माहिती त्यांना आहे. मग या केसमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब का लागला? कायद्याने बंधनकारक असलेल्या मुदतीतच दोषारोपपत्र दाखल करा. प्रक्रियेत राहिलेल्या त्रुटींचा फायदा आरोपींना होता कामा नये,’ असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी १७ जानेवारी रोजी ठेवली.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरेMurderखून