शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Cyrus Mistry Accident: “सायरस मिस्त्रींचे निधन धक्कादायक, असं काही घडेल यावर विश्वासच बसत नाही”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 21:13 IST

Cyrus Mistry Accident Latest News & Updates: सायरस मिस्त्रींनी नेहमीच देशाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करत मोलाचे योगदान दिले, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Cyrus Mistry: प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे पालघरच्या चारोटी येथील ब्रिजवर अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. केवळ उद्योजगतातून नव्हे, तर राजकीय नेतेमंडळीही सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक असून, असे काही घडेल यावर विश्वासच बसत नाही, असे सांगत तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाची बातमी धक्कादायक आहे. असे काही घडेल यावर विश्वासच बसत नाहीये. देशाच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. प्रसिद्धीपासून दूर राहिलेले सायरस मिस्त्रींनी नेहमीच देशासाठी भरीव कामगिरी केली आहे. रतन टाटांनंतर टाटा समूहाचे अध्यक्षपद सायसर मिस्त्रींकडे आले. सायरस मिस्त्री हे मितभाषी, अधिक कष्ट करणारे आणि व्यवसायात त्यांचे बारकाईने लक्ष होते. या देशातील अनेक प्रकल्पात सायरस मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. गेल्या काही वर्षामध्ये मिस्त्री यांच्या कुटुंबाला अनेक धक्के बसले आहेत. संकटाची मालिका या मिस्त्री घरावर सुरु असल्याचे दिसतेय. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यास मदत करो, या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

भारतीय उद्योग जगताची मोठी हानी

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही सायरस मिस्त्री यांच्या निधानावर शोक व्यक्त केला. टाटा सन्सचे माजी प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनानं भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारतानं एक महान सुपुत्र गमावला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी वेगळी छाप उमटवली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ सायरस यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात एकूण दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला येत होते. सूर्या नदीवरील नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने धोकादायक डिव्हायडरला कार धडकली, अशी माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारCyrus Mistryसायरस मिस्त्री