शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Cyclone Nisarga: नुकसानग्रस्तांना निकष बदलून दुपटीहून अधिक भरपाई देणार- बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 02:19 IST

गुंठ्याच्या हिशेबाने मदत देण्याचा प्रस्ताव

- गणेश चोडणेकर आगरदांडा/अलिबाग : राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र कोकणातील परिस्थितीचा विचार करता ती गुंठ्याच्या हिशेबाने कशी देता येईल, याबाबत सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करणार आहे. त्यामुळे मदतीपासून कोणीच वंचित राहणार नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे येथील घरांचे, बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी थोरात एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आले होते. मुरूड तालुक्यातील काशीद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नुकसानग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांनी धीर धरावा, विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासाठी शासन कटिबद्ध आहे. देण्यात येणाºया नुकसानीच्या मदतीचे निकष बदलून दुपटीहून अधिक करण्यात आले आहेत. पूर्ण घराचे नुकसान झाले असेल तर दीड लाख रुपये आणि अंशत: झाले असेल तर पंधरा हजारांच्या आसपास मदत देण्यात येणार आहे. बागायतदारांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करण्यात येणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.घाटावर शेती ही एकरात असते तर कोकणात अर्धा गुंठा, एक गुंठा, पाच गुंठा अशी गुंठ्यात असल्याने देण्यात येणाºया मदतीचे निकष बदलणे गरजेचे आहे, असे येथील लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. यासाठी सोमवारी होणाºया कॅबिनेटच्या बैठकीत यावर चर्चा करून त्यातून काही तरी मार्ग काढण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हा पाहणी दौरा होत असून झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केल्यानंतर यापूर्वीच्या विहित नियमांपेक्षा जास्त मदत शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झालेली आहे. यासंदर्भात शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घोषित होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हलदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी होते.‘थोड्याफार कुरबुरी होणारच ’एका राजकीय पक्षाचे सरकार असताना कुरबुरी होतात. आमचे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोड्याफार कुरबुरी तर होणारच, असे थोरात यांनी स्पष्ट करत विरोधकांना टोला लगावला. आमच्यातील विषय आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवणार आहोत, असे सांगण्यासही थोरात विसरले नाहीत. प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांना परिस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांना नुकसानीचा अंदाज येणार नाही. त्यामुळे मंत्र्यांचे दौरे वाढल्याचे त्यांनी सांगून दौºयांचे समर्थन केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात