शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

महिला आयोग उभारणार सायबर डेस्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:59 IST

फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे.

मुंबई : समाज माध्यमांचा वापर वाढला असला, तरी त्यांच्या नियमनाची कोणतीच यंत्रणा सध्या भारतात अस्तित्वात नाही. विशेषत: फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे.समाज माध्यमांतील महिलाविरोधी प्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने स्थापन केलेल्या समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सायबर सिक्युरिटीवर काम करणारे प्रशांत माळी, वैशाली भागवत, सोनाली पाटणकर, मुक्ता चैतन्य यांच्यासह पोलिस दलातील सायबर तज्ञ उपस्थित होते. समाज माध्यमातील चर्चेत महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारची अवमानकारक टिप्पणी करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याची दखल घेत महिला आयोगाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली.देशात सायबर कायदे, सायबर सेल असले, तरी समाज माध्यमांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. हे गैरप्रकार रोखण्याचे काम कोणत्या यंत्रणेने करावे, याचीच स्पष्टता नाही. शिवाय, फेसबुक आणि टिष्ट्वटरसारख्या कंपन्या सर्व्हर परदेशात असल्याचे सांगत, सरकारी यंत्रणांची बोळवण करतात, अशी भावना बैठकीत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे विशेष सायबर डेस्क उभारणे, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय स्तरावर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, याप्रकरणी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने नियमित बैठका घेऊन तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र