शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

वर्तमानात जगण्याचा राजमार्ग म्हणजे योग

By admin | Updated: June 18, 2017 00:17 IST

डॉ. सद्गुरूयोगीराज श्री श्री मंगेशदा हे सद्गुरू क्रि या योगा फाउंडेशनचे व्यवस्थापक. या फाउंडेशनच्या जगभरात ९३ शाखा आहेत. मंगेशदा

डॉ. सद्गुरूयोगीराज श्री श्री मंगेशदा हे सद्गुरू क्रि या योगा फाउंडेशनचे व्यवस्थापक. या फाउंडेशनच्या जगभरात ९३ शाखा आहेत. मंगेशदा यांनी भारताला एशियन कराटे चॅम्पियनशिप मिळवून दिली आहे. संगीत, नृत्य, क्रीडा या तिन्ही कलांमध्ये त्यांना नैपुण्य प्राप्त आहे. देशातील ज्येष्ठ योगतज्ज्ञांपैकी ते एक आहेत. गेली ५ दशके योगशास्त्राबाबत आणि क्रि यायोगाबाबत त्यांचे संशोधन सुरू आहे. तसेच जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार ते करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आयुष मिनिस्ट्री अ‍ॅण्ड कर्नाटक गव्हर्नमेंट अ‍ॅवॉर्ड, इंडो-व्हियतनाम अ‍ॅवॉर्ड, ग्रीन अ‍ॅम्बेसेडर अ‍ॅवॉर्ड, ज्वेल आॅफ इंडिया अ‍ॅवॉर्ड, एशिया पॉसिक इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. २१ जून या ‘जागतिक योग दिना’चे औचित्य साधून त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद.योग या शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे?ज्ञात आणि अज्ञात गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे योग. प्रत्येक व्यक्ती ही योग घेऊनच जन्माला आलेली असते. प्रत्येक मूल आईच्या गर्भाशयातच योग घेऊन आलेले असते. आपण सर्वच श्वास आणि उच्छ्वासाबरोबर योग घेऊनच जन्माला आलेलो आहोत.योगाचा आणि मानवी मनाचा कसा संबंध आहे ?माणसाचे मन हे हळवे असते आणि ते सतत भविष्यकाळात किंवा भूतकाळात रमते. परिणामी त्याच्यावरचा तणाव वाढतो, आजारपण वाढतात. योगाभ्यास तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतो. मुळात योग साधना ही अतिप्राचीन आहे. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची गरज बनली आहे. श्वासावर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे प्राणायाम. शरीराचा आणि श्वासाचा योग्य वापर करून मनावर मिळवलेले संपूर्ण नियंत्रण म्हणजेच योग.प्राणायाम आणि ध्यानधारणा याच्या माध्यमातून ताण-तणाव कसा कमी करता येतो?माझ्या अनेक वर्षांच्या संशोधनातून एक गोष्ट मी सिद्ध केली आहे की प्राणायामाच्या माध्यमातून शरीरातील दोष बाहेर काढता येतात. मन सुदृढ तर शरीर सुदृढ. शरीरातील श्वसनाचे प्रमाण असमान होण्यास कारण ताण-तणाव, दूषित वातावरण, अकार्यक्षम फुप्फुस, चुकीचा आहार इ. प्राणायमाद्वारे नाडीशुद्धी केल्यामुळे शरीरातील मज्जासंस्था कार्यक्षम बनते. ध्यानधारणेने मन शुद्ध आणि स्थिर होते. चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते; त्याबरोबर शुद्धीच्या क्रिया संपूर्ण शरीराला निरोगी, निकोप ठेवतात.कॅन्सर, मधुमेह, पॅरेलेसिस यांच्यावर आपण कित्येक वर्षे संशोधन केलेले आहे, योग साधनेच्या माध्यमातून अशा दुर्धर रोगांवर कसे नियंत्रण मिळवता येईल?९५ टक्के आजार हे मानसिक स्तरावर होतात. योगामुळे इच्छाशक्ती वाढते. शरीरातले अवयव, पेशी आणि विचारांची तीव्रता उत्कृष्ट पद्धतीने वाढवली जाते. गेल्या कित्येक वर्षांत योगचिकित्सेने कॅन्सरसारख्या आजारावर योगाच्या माध्यमातून मात करून लोक आज सुदृढ आयुष्य जगत आहेत. योगातील वमन, बस्ती, नेती या क्रियांद्वारे शरीरातील अशुद्ध द्रव्य बाहेर काढले जाते. म्हणूनच वैद्यकीय उपचाराबरोबर योगचिकित्सा ही अतिशय परिणामकारक ठरलेली आहे. योग हा कमीतकमी वेळेत आणि अगदी अल्पशा मोबदल्यात करण्याचा उपाय आहे. ज्यामुळे माणसाला विविध समस्यांमधून कायमस्वरूपी मुक्ती मिळू शकते. लवकरच तुम्ही योग साधनेतील सुवर्ण महोत्सवात प्रवेश करणार आहात तसेच तुम्हाला डॉक्टरेट ही पदवीसुद्धा बहाल करण्यात आली आहे, तर काय सांगाल तुमच्या ४९ वर्षांतील योगसाधनेच्या अनुभवांविषयी?मी वयाच्या ६व्या वर्षी दहिसरमधल्या एक छोट्याशा गावातून माझ्या योगसाधनेला सुरुवात केली. मी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आमच्या सद्गुरू मंगशेदा क्रिया योगा फाउंडेशनच्या जगभरात आज ९३ शाखा आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यातले सर्वांत मोठे यश आम्हाला नेत्रदानाच्या अभियानाला मिळाले. या अभियानांतर्गत सुमारे ४४ लाख लोकांनी नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतली आहे. तसेच यातील काही लोकांनी आपले मरणोत्तर नेत्रदानही केले आहे. मी अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम राबवली. स्वच्छता अभियान, लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण, महिलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे दिले. त्याचबरोबर संगीत, क्रीडा आणि कला या माध्यमातून योग आणि स्वास्थ्य यांचा सतत प्रचार सुरू आहे. वेगवेगळी व्यसनमुक्ती आंदोलनेही केली, जेलमधील कैद्यांना मी योगाचे प्रशिक्षण देतो आहे. आज मला अभिमान वाटतोय की या प्रवासात जगभरातून लाखोंच्या संख्येने विविध धर्माची माणसे या योगसाधनेत सामील झालेली आहेत. योग हा आध्यात्माकडे सहजपणे घेऊन जाण्याचा राजमार्ग आहे. तसेच या एकाच विषयाने संबंध देश एक होतोय आणि लवकरच प्रेम आणि शांती यांचाही योग जगभरात येईल.