शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

शेतकर्‍यांच्या माथी निकृष्ट बियाणे!

By admin | Updated: July 4, 2014 00:44 IST

कृषी सेवा केंद्रांकडून शेतकर्‍यांची लूट

अकोला: बियाण्यांचा तुटवडा असल्याचे भासवून निकृष्ट व बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचा सपाटा कृषी सेवा केंद्र मालकांनी लावला आहे. नामवंत कंपन्यांचे व शेतकर्‍यांना हवे असलेले बियाणे न देता निकृष्ट कंपन्यांचे बियाणे घेण्याची सक्ती शेतकर्‍यांना केली जात आहे. पावसाने दडी मारल्याने देशाचा पोशिंदा अगोदरच हवालदिल झालेला असताना, निकृष्ट बियाणे जास्त भावात विकून शेतकर्‍याची लूट केली जात आहे. जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पेरण्याच केल्या नाहीत. शेतकरी अजूनही बियाणे व खतांच्या खरेदीतच व्यस्त आहेत. दरवर्षी जिल्हय़ात लाखो हेक्टरवर कपाशीची पेरणी केली जाते. गतवर्षी ज्या बियाण्यांमुळे चांगले उत्पादन मिळाले, तेच बियाणे खरेदी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल असतो; मात्र बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गेल्यानंतर शेतकर्‍यांसमोर भलत्याच अटी ठेवल्या जात आहेत.शेतकर्‍यांनी मागितलेल्या कंपनीचे त्याला हवे तेवढे बियोणे देण्यास स्पष्ट नकार देत आहेत. कोणत्याही शेतकर्‍यास त्याने मागितलेल्या कंपनीच्या बियाण्यासोबत, दुकान मालक म्हणेल त्या कंपनीचे बियाणे घ्यावे लागत आहे. शेतकर्‍याने नकार दिला, तर त्याला हवे असलेल्या कंपनीचे बियाणेही दिले जात नाही. शेतकर्‍यांकडून यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्यानंतर, लोकमत चमूने शेतकरी ग्राहक बनून या प्रकाराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान लोकमत चमूलाही तोच अनुभव आला. अनेक कृषी केंद्रांमध्ये अशी सक्ती केली जात असल्याने, शेतकर्‍यांना हतबल होऊन अन्य कंपन्यांचे निकृष्ट बियाणे विकत घ्यावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे या निकृष्ट बियाण्याची किंमतही, शेतकर्‍याने मागितलेल्या नामांकित कंपनीच्या बियाण्याएवढीच लावली जाते, हे विशेष.