शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगामात राज्यात यंदा ४१ लाख टन साखरेचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 23:44 IST

चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप झाले असून ४१ लाख १६ हजार ४८ टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात पुणे विभाग तर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप झाले असून ४१ लाख १६ हजार ४८ टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात पुणे विभाग तर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.राज्यात २० आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू झाला असला तरी दिवाळीनंतरच त्याने गती घेतली. राज्यातील सहकारी ९९ आणि खासगी ८६ अशा १८५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ७ लाख ६६८० टन इतकी आहे. राज्यातील ७ विभागांपैकी पुणे विभागात सर्वाधिक ६२ कारखानेसुरू आहेत. या कारखान्यांनी १६९ लाख २५ हजार क्विंटल उसाचे गाळप करून १७ लाख ३८८ हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा १०.२७ टक्के आहे.त्याखालोखाल कोल्हापूर विभागात ३६ कारखाने सुरू असून त्यांनी ८३ लाख ४० हजार टनउसाचे गाळप करुन ९ लाख ५८१ टन साखरेचे उत्पादन केले आहे.कोल्हापूर विभागाचा साखर उतारा ११.४९ टक्के इतका तर राज्याचा साखर उतारा १०.४४ टक्के इतका आहे.राज्यात या हंगामात १०७.२३ लाख टन साखर उत्पादन होईल, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, दुष्काळ आणि हुमणीचा प्रार्दुभाव यामुळे उत्पादनात घट येऊन ९५ लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.कोल्हापूर विभागात ऊस बिलांचा तिढागाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले तरी कोल्हापूर विभागात शेतकºयांच्या हाती अद्याप ऊस बिले पडलेली नाहीत. एफआरपी एकरकमी देण्याला कारखान्यांनी असमर्थता व्यक्त करून सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीच मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात कोल्हापुरातील साखर कारखानदारांची ५ जानेवारीला बैठक होत आहे. राज्यात अन्यत्र मात्र एफआरपीचे तुकडे पाडून काही कारखान्यांनी ८० -२० किंवा ८० -३० अशा स्वरुपात ऊस बिले देणे सुरू केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने