शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित कंपन्यांवर गुन्हे, यवतमाळच्या विषबाधाप्रकरणी झाडाझडती : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:53 IST

कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली.

मुंबई : कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली. त्यामुळे कीटकनाशक कंपन्या आणि वितरकांवर अप्रमाणित रसायने विक्री प्रकरणी कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असून, शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी येथे सांगितले.शेतकरी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर फुंडकर यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतली. कृषिमंत्र्यांनी कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. कंपन्यांनी केवळ नफा न कमवता शेतकºयांप्रति सामाजिक बांधिलकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. आपण उत्पादित केलेल्या कीटकनाशकामुळे शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात दाखल होत आहेत, याची माहिती घेण्याचीही गरज भासली नाही का, असा संतप्त सवाल कृषिमंत्र्यांनी केला. फवारणीबाबत मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे, अशा शब्दांत त्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींची कानउघाडणीकेली.गरजेपेक्षा जास्त कीटकनाशकांची विक्री झाल्याची चौकशी करण्यात आहे. सप्टेंबरमध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यात बियाण्यांची माहिती, वापर, फवारणीचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी नेमणार होते, मात्र नियुक्ती झाली नाही. बियाणे कंपन्यांनी किती बैठका घेतल्या, याची माहिती शासनाला सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.सहाय्यता निधी वर्गयवतमाळ जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मुख्यमंत्री साहाय्यता निधी निधीतून मंजूर केले असून, त्यासाठी एकूण ३२ लाख रुपये जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे.शेतकºयांचे मृत्यू हेबहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्रनागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन आतापर्यंत ४० शेतकºयांचे मृत्यू झाले आहेत. हा केवळ अपघात नव्हे, तर हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्र आहे. यासाठी कीटकनाशक बनवणाºया कंपन्या, त्याची शहानिशा न करता मंजुरी देणारे सरकार आणि त्याचे प्रमाणीकरण न तपासताच त्याचा उपयोग करू देणारे अधिकारी दोषी आहेत, असा आरोप राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.कीटकनाशक कंपन्यांनी १० हजार कोटींचा व्यवसायकेला. परंतु ही घटना झाली तेव्हा एकही अधिकारी ‘अ‍ॅण्टी डोस’चे कीट वाटायला आला नाही. मी आज सरकारमध्ये असलो तरी सातत्याने हा प्रश्न मांडत आहे. फडणवीस सरकार आम्ही केलेल्या सूचनांवर तातडीने कारवाईसुद्धा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.विनापरवाना कीटकनाशकांचा साठा अकोल्यातून जप्त!अकोला : पश्चिम विदर्भात विनापरवाना कीटकनाशकांची विक्री केली जात असून, येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामांतून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच कृषी आयुक्तांसमोर होणार आहे.जहाल कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात ३४पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, पाचशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. सर्वाधिक मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झाले आहेत. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीतील फेज २मध्ये माहेश्वरी बायो फ्यूएल प्लॉट क्रमाक १४ येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅक्चर कंपनीफेज २ प्लॉट नं. एफ -२२मध्ये मे. भारत इन्सेक्टिसाइड लि. गोदाम आहे. या दोन्ही ठिकाणांहून अप्रमाणित तण व कीटकनाशके बाजारात पुरविली जात होती. गुणनियंत्रण विभागाने मागील आठवड्यात येथे छापा टाकला होता.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार