शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

अप्रमाणित कंपन्यांवर गुन्हे, यवतमाळच्या विषबाधाप्रकरणी झाडाझडती : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:53 IST

कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली.

मुंबई : कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली. त्यामुळे कीटकनाशक कंपन्या आणि वितरकांवर अप्रमाणित रसायने विक्री प्रकरणी कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असून, शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी येथे सांगितले.शेतकरी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर फुंडकर यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतली. कृषिमंत्र्यांनी कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. कंपन्यांनी केवळ नफा न कमवता शेतकºयांप्रति सामाजिक बांधिलकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. आपण उत्पादित केलेल्या कीटकनाशकामुळे शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात दाखल होत आहेत, याची माहिती घेण्याचीही गरज भासली नाही का, असा संतप्त सवाल कृषिमंत्र्यांनी केला. फवारणीबाबत मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे, अशा शब्दांत त्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींची कानउघाडणीकेली.गरजेपेक्षा जास्त कीटकनाशकांची विक्री झाल्याची चौकशी करण्यात आहे. सप्टेंबरमध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यात बियाण्यांची माहिती, वापर, फवारणीचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी नेमणार होते, मात्र नियुक्ती झाली नाही. बियाणे कंपन्यांनी किती बैठका घेतल्या, याची माहिती शासनाला सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.सहाय्यता निधी वर्गयवतमाळ जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मुख्यमंत्री साहाय्यता निधी निधीतून मंजूर केले असून, त्यासाठी एकूण ३२ लाख रुपये जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे.शेतकºयांचे मृत्यू हेबहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्रनागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन आतापर्यंत ४० शेतकºयांचे मृत्यू झाले आहेत. हा केवळ अपघात नव्हे, तर हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्र आहे. यासाठी कीटकनाशक बनवणाºया कंपन्या, त्याची शहानिशा न करता मंजुरी देणारे सरकार आणि त्याचे प्रमाणीकरण न तपासताच त्याचा उपयोग करू देणारे अधिकारी दोषी आहेत, असा आरोप राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.कीटकनाशक कंपन्यांनी १० हजार कोटींचा व्यवसायकेला. परंतु ही घटना झाली तेव्हा एकही अधिकारी ‘अ‍ॅण्टी डोस’चे कीट वाटायला आला नाही. मी आज सरकारमध्ये असलो तरी सातत्याने हा प्रश्न मांडत आहे. फडणवीस सरकार आम्ही केलेल्या सूचनांवर तातडीने कारवाईसुद्धा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.विनापरवाना कीटकनाशकांचा साठा अकोल्यातून जप्त!अकोला : पश्चिम विदर्भात विनापरवाना कीटकनाशकांची विक्री केली जात असून, येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामांतून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच कृषी आयुक्तांसमोर होणार आहे.जहाल कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात ३४पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, पाचशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. सर्वाधिक मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झाले आहेत. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीतील फेज २मध्ये माहेश्वरी बायो फ्यूएल प्लॉट क्रमाक १४ येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅक्चर कंपनीफेज २ प्लॉट नं. एफ -२२मध्ये मे. भारत इन्सेक्टिसाइड लि. गोदाम आहे. या दोन्ही ठिकाणांहून अप्रमाणित तण व कीटकनाशके बाजारात पुरविली जात होती. गुणनियंत्रण विभागाने मागील आठवड्यात येथे छापा टाकला होता.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार